नाशिक

नाफेडमार्फत खरेदी केलेला कांदा होतोय खराब

चाळी फोडल्यावर झाले उघड; सहकारी संस्थाचालकांच्या अडचणी वाढल्या

लासलगाव : वार्ताहर
नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात नाफेड आणि एनसीसीएफमार्फत तब्बल तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती. मात्र, या बफर स्टॉकमधील कांद्याचा साठा आता मोठ्या प्रमाणावर खराब होऊ लागल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. कोलकाता, गुवाहाटी आणि चेन्नई येथे कांदा पाठवण्यासाठी शासकीय गोडावूनमधील चाळी फोडण्यात आल्यावर ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.
नाफेड, एनसीसीएफच्या कांद्याच्या साठ्याच्या प्रतवारीदरम्यान तब्बल 20 ते 25 टक्के कांदा खराब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित चाळी फोडल्यावर अजून किती कांदा निकृष्ट निघेल, याबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे खरेदी केलेला हा बफर स्टॉक प्रत्यक्षात किती उपयुक्त ठरेल, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

केवळ 65 टक्के रिकव्हरी कशी साधायची?

केंद्र सरकारच्या वतीने खरेदी केलेल्या या कांद्याच्या देखरेख व साठवणुकीची जबाबदारी खरेदीदार सहकारी संस्था व मंडळांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, कांद्याचा साठा खराब होऊ लागल्याने फक्त 65 टक्के रिकव्हरी कशी साधायची, हा मोठा प्रश्न संस्थाचालक व संचालक मंडळासमोर उभा राहिला आहे. खराब झालेल्या कांद्याची विल्हेवाट लावणे, इतर बाबींमुळे या संस्थांच्या आर्थिक घडामोडी आणखी गुंतागुंतीच्या होऊ लागल्या आहेत.

कांदा उत्पादक आर्थिक संकटात

खरेदी केलेल्या तीन लाख मेट्रिक टन कांद्यापैकी काही कांदा कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई यांसारख्या शहरांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र, दोन ते अडीच महिने उलटून गेल्यानंतरही नाफेड, एनसीसीएफला दिलेल्या कांद्याचे पैसे मिळालेले नाही, दुसरीकडे हा कांदा बाजारात आल्यामुळे कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शिल्लक असलेल्या कांद्याचा उत्पादन खर्च निघणेही मुश्कील झाला आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दसरा, दिवाळीसाठी घरामध्ये पैशाची गरज असताना आता काय करावे, असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago