संघर्षातून उभी राहिलेली धैर्याची कहाणी

पुणे शहरात प्रवास करताना रिक्षावाल्यांची टाळाटाळ ही काही नवी गोष्ट नाही. जेवायची वेळ झाली, दुसरे भाडे आहे, अशा अनेक कारणांनी ते ग्राहकांना नकार देताना दिसतात. पण अशाच परिस्थितीत एका महिला रिक्षाचालक ताईंची भेट झाली आणि तो अनुभव खास ठरला.
कोथरूडच्या मनीषा शिंदे गेल्या दीड वर्षांपासून रिक्षा चालवतात. सहज संवाद साधला असता, त्यांनी आपली कहाणी उलगडली. मनीषा म्हणाल्या, की पुण्यात आजघडीला 9-10 महिला रिक्षा चालवतात. पुरुष रिक्षाचालकांच्या बायका धुणीभांडी करून उदरनिर्वाह करतात. पण मी धुणीभांड्यांऐवजी रिक्षा चालवायचा निर्णय घेतला. यात माझ्या पतीनेही मला साथ दिली, ते स्वतः ओलाचालक आहेत.
रोजंदारीबाबत सांगताना त्या पुढे म्हणाल्या, की दररोज साधारण 700-800 रुपयांची कमाई होते. यातून 100-200 रुपये गॅसवर खर्च होतात. म्हणजे दिवसाला 600-700 रुपये हातात पडतात. धुणीभांड्यांच्या कामातून एवढे उत्पन्न मिळाले नसते. सुरुवातीला रस्ते चुकायचे, पण आता शहराच्या कानाकोपऱ्यांत निःसंकोच जाते.
पुरुष रिक्षाचालक अनेकदा जवळच्या भाड्यासाठी कंटाळा करतात. मात्र, मनीषा कोणतेही भाडे नाकारत नाहीत. हो, लोक कधी हिणवतातही. पण माझ्या कष्टाने पैसा कमावतेय, हे समाधान खूप मोठं आहे, असे त्या ठामपणे म्हणाल्या.
ठाणे-मुंबईसारख्या पुण्यातही गुलाबी रिक्षा सुरू झाल्या, तर महिलांविषयीचा आदर आणि प्रवाशांचे कुतूहूल वाढेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
आजच्या काळात समाजातली ही रिक्षावाली ताई फक्त रिक्षा चालवत नाही, तर धैर्य, आत्मविश्वास आणि सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग दाखवत आहे.

 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

21 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

40 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

47 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

56 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago