ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन असा करा अर्ज

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त
ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

नाशिक :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, नाशिक यांचेमार्फत 23 ते 26 मे, 2022 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने
“पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. या
ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा कौशल्य विकास
विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी  केले आहे.
जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना
कामाची आवश्यकता आहे. याकरीता नियोक्ते आणि नोकरी ईच्छूक उमेदवारांसाठी
ऑनलाईन पद्धतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करून एका छत्राखाली ही सुविधा उपलब्ध
करून देण्यात येत आहे. यामधील मुलाखती मोबाईल दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे
स्काईप, व्हॉट्सअप इत्यादी माध्यमांद्वारे घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप सेवा
योजना नोंदणी केली नसेल, अशा उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या
संकेतस्थळावर किंवा अँण्ड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam हे ॲप
डाऊनलोड करून नोंदणी करावी.
नोंदणी झाल्यानंतर उमेदवार पात्रतेनुसार रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांनी
सादर केलेल्या पदानुसार आवश्यक कागदपत्रे व निकष पूर्ण करीत असल्यास त्या
उमेदवारांची निवड नियुक्ती धारकांकडून भ्रमणध्वनीद्वारे मुलाखत घेवून करण्यात येणार
आहे. भरती इच्छुक नियोक्त्यांनी महास्वयम वेब पोर्टलवर “पंडित दीनदयाळ उपाध्याय
जॉब फायर” या ऑप्शन वर क्लिक करुन नाशिक ऑनलाईन जॉब फायर -2 (2022-23)
यावर जनरल, ईपीपी, ॲप्रटिंस आदी रिक्तपदे अधिसूचित करावी. तसेच सदर
मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिद्धी विभागावरील वेबपोर्टलवर विनामुल्य
करावी, असेही  नमुद करण्यात आले आहे.

नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 0253-2993321 कार्यालयाच्या या दूरध्वनी
क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन
रोजगार मेळाव्यात भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी सहभाग घ्यावा,
असे आवाहन सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी  केले आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

7 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

7 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

7 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

7 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

7 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

7 hours ago