ऑनलाईन व्यवहाराचा व्याप; वृद्धांना ठरतोय ताप

डिजिटल सक्षरते अभावी फसवणूक प्रकारांत वाढ

नाशिक : अश्विनी पांडे 

केंद्र सरकारने गेल्या काही वर्षात डिजिटल माध्यमातून होणार्‍या ऑनलाइन व्यवहाराला चालना दिली असून  कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षात एटीएमचा वापरही वाढले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष बॅकेत जाऊन तासनतास रांगेत उभे राहत अर्थिक व्यवहार करण्याच्या ऐवजी मोबाईलच्या एका क्लिकवर अर्थिक व्यवहार करण्याचे प्रमाण वाढले आहे.

डिजिटल माध्यमातून होणारे  व्यवहार तात्काळ  आणि सुसह्य झाले आहेत. कोरोना काळात ऑनलाइन व्यवहाराला अधिक महत्त्व आले. सोशल डिस्टन्सिंग पाळत व्यवहार करणे कोरोना काळात उपयोगी ठरले. मात्र या डिजिटल माध्यमातून होणार्‍या व्यवहाराचे  जसे अनेक फायदे त्याप्रमाणे तोटेही आहेत. तरूण वर्गाला डिजिटल व्यवहार एक वरदान ठरत असल तरी वृध्दांसाठी डिजिटल व्यवहार मात्र  अडचणीचे ठरू लागले आहेत. मोबाईलच्या माध्यमातून होणार्‍या ऑनलाइन पेमेंट करण्याची पध्दत समजून घेण्यास वयस्कर लोकांना कठिण जात आहे. तसेच अनेक वयस्कर लोकांची डिजिटल पेमेंट करत असताना मोठ्या प्रमाणात अर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे वयस्कर नागरिक ऑनलाइन माध्यमातून व्यवहार करण्यास घाबरतात. विशेष म्हणजे वयस्कर लोकांना ऑनलाइन व्यवहारात तर अडचणी येतच आहेत. मात्र बॅकेत जाऊन प्रत्यक्ष व्यवहार करणेही तापदायक ठरत आहे. कारण बॅक कर्मचारी दहा हजाराहून कमी रक्कम बँकेतून देण्यात टाळाटाळ करत असतात.  त्यामुळे वयस्कर नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. एटीएम आणि ऑनलाइन व्यवहार जमत नाहीत.त्यात बॅकेत जाऊन व्यवहार करायचे म्हटल्यास पासबुक असूनही कमी रक्कम  बँकेतून काढून देण्यास टाळाटाळ करत असल्याने वृध्द नागरिक हैराण झाले आहेत. अर्थिक व्यवहार नेमके कसे करायचे असा प्रश्न वृध्दासमोर निर्माण झाला आहे.

वृद्धांसाठी तापदायक

कॅशलेस व्यवहार तरूण वर्गासाठी फायद्याचे ठरत असले तरी वयस्कर नागरिकांना ऑनलाइन  कॅशलेस व्यवहार करणे जिकरीचे ठरत आहे.

कॅशलेस व्यवहार वाढ

कोरोना काळात कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यात आले.

बँकांमधील गर्दी झाली कमी

ऑनलाइन  व्यवहाराचे प्रमाण वाढल्याने बॅकेत होणार्या गर्दीचे प्रमाण घटले आहे.  पुर्वी बॅकेत असणारी गर्दी आता काही प्रमाणात कमी असते.

पासबुकचा उपयोग कागदपत्रांसाठी !

बॅकिंक  व्यवहार करण्यासाठी बँकेकडून ग्राहकांना पासबुक दिले जाते. मात्र ऑनलाइन व्यवहाराचे प्रमाण वाढल्याने पासबुकचा वापर कमी झाला आहे. गुगल पे, फोन पे सुरू करण्यासाठी आणि कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पासबुकचा वापर केला जात आहे.

चोरीचे प्रमाण घटले.

कॅशलेस व्यवहाराचे प्रमाण वाढल्याने  नागरिक पाकिटात  कमीत कमी प्रमाण पैसे ठेवतात. आणि पैसे लागल्यास ऑनलाइन माध्यमातून फोन पे अथवा गुगल पे चा वापर करत असतात.कदाचित याची चोरांना जाणिव झाली असावी म्हणून पाकिटमारीचे प्रमाण घटले आहे.

ऑनलाइन अर्थिक फसवणुकीत वाढ

प्रत्यक्षात चोरीचे पाकिटमारीचे प्रमाण कमी झाले असले तरी ऑनलाइन माध्यमातून अर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाइन माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्थिक फसवणूक झाल्याचे गुन्हे उघडकीस येत आहेत.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

12 hours ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

13 hours ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

13 hours ago

काठे गल्लीतील ते अनधिकृत स्थळ हटवले

सिडको : विशेष प्रतिनिधी -मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काठे गल्लीतील अनधिकृत स्थळ महापालिका…

15 hours ago

अवघ्या दीड महिन्यातच हेमलता पाटील यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…

1 day ago

मनमाडला कांदे ट्रॅक्टरमध्ये भरताना शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू

मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…

1 day ago