जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटीचा भार
नवीदिल्ली : देशात आजपासून जीवनावश्यक आणि रोजच्या वापरातील काही वस्तुं महागणार आहेत. या वस्तुंवर पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार असल्याने सामान्यांची महागाईमुळे आणखी होरपळ होणार आहे.
आजपासून पॅक केलेले आणि लेबल असलेले दही, पनीर, लस्सी यावर आधिक जीएसटी भरावा लागणशर आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे. मागील महिन्यात जीएसटी परिषदेने विविध उत्पादनांवरील जीएसटी दर सुधारित केले आहेत.

 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने ते अधिसूचित केले आहेत. त्यामुळे सामान्यांचा खर्च महागणार आहे.दही, लस्सी, पनीर, मध,तृणधान्ये, मांस, मासे यांच्या खरेदीवर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयात पाच हजार रुपयांपेक्षा जास्त भाड्याने घेतलेल्या रुमवर पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. चेकबुक जारी करताना बँकाकडून आकारण्यात येणार्‍या शुल्कावर 18 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. दररोज एक हजार रुपयांपेक्षा कमी भाड्याने असलेल्या हॉटेलच्या खोल्यांवर बारा टक्के जीएसटी लागू असेल.
टेट्रा ॅपकवरील दर बारा टक्कयांवरुन 18 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. छपाई तसेच लेखन किंवा रेखांकन शाई, एलईडी दिवे यावर 12 ऐवजी 18 टक्के तसेच नकाशे, ऍटलस, ग्लोबवर, चाकू, पेन्सिल, पिठाची गिरणी, डाळ यंत्रावर पाच टक्कयांऐवजी बारा टक्के, तसेच सायकल पंप, सर्किट बोर्ड यावर बाराऐवजी अठरा टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

 

हेही वाचा : महागाईवरील ‘इंधन’ उतारा

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

View Comments

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

7 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

8 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

8 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

8 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

8 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

8 hours ago