नाशिक

शहरात पाण्याची गरज वाढली दररोज 5 दक्षलक्ष लिटर पाण्याची वाढ

शहरात पाण्याची गरज वाढली
दररोज 5 दक्षलक्ष लिटर पाण्याची वाढ
नाशिक : प्रतिनिधी मागील वर्षी मुबलक प्रमाणात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे नाशिककरांवरचे पाणीसंकट टळले . शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाला यंदा मराठवाड्याला पाणी सोडण्याची वेळ आली नाही . दरम्यान , गेल्या महिन्याभरापासून पडत असलेल्या कडाक्याच्या उष्णतेमुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे . त्यानुसार पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नियोजन करण्यात आले असून , दररोज ५ दशलक्ष लिटर पाणी वाढवण्यात आले आहे . पाण्याची वाढ केल्यामुळे नाशिककरांना पाणीटंचाईच्या समस्येला अद्यापपावेतो तरी तोंड देण्याची वेळ आलेली नाही . वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढल्याने त्यादृष्टीने पाण्याचे नियोजन केले आहे . त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईतून सुटका होणार आहे . शिवाजीनगर फिल्ट्रेशन प्लांट येथून १२० दशलक्ष लिटर पाणी उचलण्यात येत होते . आता मात्र ४ दशलश लिटर म्हणजेच ४० लाख लिटर पाणी वाढविण्यात आले आहे . तर मुकणे धरणातून १३२ ऐवजी १३३ दशलक्ष लिटर म्हणजेच दररोज १० लाख लिटर पाणी वाढविण्यात आले आहे . उन्हाळा सुरू झाला की , दरवर्षी पाण्याची मागणी वाढते . धरणसाठ्यातील पाणी लक्षात घेता महापिालकेकडून न पाण्याचे नियोजन करून त्या प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येतो . गतवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात गंगापूर व मुकणे धरणात पाणीसाठा मुबलक प्रमाणात असल्याने यंदाचे पाणीकपातीचे संकट टळले आहे . आजवर पाण्यासाठी नाशिक विरुद्ध मराठवाडा असा सामना रंगताना दिसला आहे . मात्र , मागील दोन वर्षांपासून पर्जन्यमान चांगले होत असल्याने गंगापूर धरणातून पाणी सोडण्याची वेळ आलेली नाही . दरम्यान , शहरात वाढत्या उष्णतेमुळे ठिकठिकाणी पाण्याची मागणी वाढली असून , नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे .. वाढत्या मागणीप्रमाणे मनपाने शहरात ५० लाख लिटर पाण्यात वाढ केली आहे .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

6 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

6 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

6 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

6 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

6 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

6 hours ago