नाशिक

बालविवाह रोखण्यात पोलीसांना यश

रोखले २ बालविवाह त्र्यंबकचे बालविकास प्रकल्पाधिकारी , ग्रामसेवक , अंगणवाडीसेविका आणि पोलीस यांची एकत्रित कारवाई

त्र्यंबकेश्वर : वार्ताहर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि युनिसेफ यांची एकत्रित बैठक रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आली होती . या बैठकीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा , असे निर्देश दिले होते . त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बालविकास प्रकल्पाधिकारी भारती गेजगे यांना रात्री ११ वाजता वावीहर्ष या गावात एका १७ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती . त्याचबरोबर टाकेहर्ष येथे एका १६ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार , अशी माहिती मिळाली . हे दोन्ही बालविवाह रोखण्यासाठी संबंधित दोन्ही गावांतील ग्रामसेवक , अंगणवाडीसेविका , पोलीस प्रशासन यांना संपर्क करून घटनास्थळी भेट देत कारवाई करण्यास सांगितले .  , वावीहर्ष येथील ग्रामसेवक किसन राठोड , अंगणवाडी सेविका संगीता किर्वे यांनी गावातील बालविवाह होणाऱ्या कुटुंबात जाऊन संबंधित मुलगी व तिचे पालक यांची समजूत काढली . त्याचबरोबर टाकेहर्ष या गावातील ग्रामसेवक विजय आहिरे यांनी गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन समुपदेशन केले आणि विवाह थांबवला . काल रोजी झालेल्या बैठकीत बालविवाह रोखण्यासाठी सूचना करण्यात आल्यानंतर लगेचच त्र्यंबकेश्वरमध्ये संबंधित गावातील ग्रामसेवक व अंगणवाडीसेविका यांनी कारवाई केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले .

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

23 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

42 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

49 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

58 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago