राजकीय पक्षांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लक्ष

नाशिक : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांच्या निवडणुकीची अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली आहे. त्यापाठोपाठ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी (दि.23) जाहीर केला. त्यानुसार आरक्षण सोडत 31 मे रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान त्याआधी 27 मेस यासंदर्भातील नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. आरक्षण काढल्यानंतर दुसर्‍या दिवशी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. हरकती सुनावणीनंतर अंतिम आरक्षण सोडत 13 जूनला होणार आहे. दरम्यान आरक्षण सोडत ऑनलाइन पध्दतीने होणार की, कालिदास कलामंदीर हे अद्याप स्पष्ट होउ शकलेले नाही.
मंगळ्वारी प्रसिध्द होणार्‍या आरक्षण सोडतीकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याचे कशा पध्दतीने आरक्षण पडेल. याची जोरदारच चर्चा राजकीय सुरु आहे. ओबीसी घटकांशिवाय आरक्षण पडत असल्याने 104 जागा खुल्या प्रवर्गातून तर 19 अनुसूचित जाती व 9 अनुसूचित जमाती या प्रमाणे आरक्षण पडणार आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेद्वारांना खुल्या गटातून उमेद्वारी करावी लागणार आहे. दरम्यान 31 मे रोजी थेट प्रभाग निहाय आरक्षण पडणार असल्याने राजकीय पदाधिकार्‍यांची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. आरक्षण सोडतीनंतर 1 ते 6 जूनपर्यंत त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर आक्षेप आणि हरकतींवर विचार करुन अंतिम आरक्षण सोडत 13 जूनला अंतिम होऊन प्रसिद्ध केली जाइल. आरक्षण अंतिम झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेसाठी साधारणचा दीड महिन्याचा कालावधी लागेल. त्यामुळे महापालिकांंमध्ये सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस निवडणूका होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 12 जूनला होणार आहे. तोपर्यंत राज्य सरकार ट्रिपल टेस्ट आणि इम्पिरिकल डाटा तयार करुन सादर करणार का हे पाहावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणासाठी बांठिया आयोगाची नियुक्ती केली आहे. राज्य मंत्रीमंडळाचा ठराव सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत राज्य निवडणूक आयोगाला तात्काळ महापालिका निवडनुकीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने यापूर्वी 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहिर केली होती. यात सात प्रभागांमध्ये काहीसे बदल करत इतर सर्व प्रभागांची रचना जैसे थे ठेवली होती. प्रभागाची रचना झाल्यानंतर सोमवारी आरक्षण जाहिर करण्यात आले. आता 31 मे रोजी महापालिकेतील आरक्षण सोडत टाकली जाणार आहे.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago