अस्वली स्टेशन :
नाशिक-मुंबई महामार्गावरील गोंदे फाट्यावर उड्डाणपुलासाठी 20 फूट खोल खड्डा खोदण्यात आला असून, तो धोकादायक ठरत आहे. या खड्ड्यात पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. या कामामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.
पादचार्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोे. गोंदे महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना करावी, तसेच पुलाचे काम मार्गी लागावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब खातळे व नागरिकांनी केली आहे. रुंदीकरणाचे काम चार महिन्यांपासून धीम्या गतीने सुरू आहे. गोंदे फाट्यावरील
चौफुलीवर उड्डाणपुलासाठी खोदलेले मोठे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. तातडीने काम पूर्ण व्हावे, अशी मागणी अजय नाठे, सुदाम जाधव, समाधान नाठे, मनोज आहेर यांनी केली आहे.
खा. वाजे : शिवसेना कार्यालयात मनसे पदाधिकार्यांची उपस्थिती नाशिक : प्रतिनिधी सरकारला हिंदीसक्तीचा निर्णय मागे…
धरण समूहात 47 टक्के; गंगापूर धरणात 56 टक्के पाणीसाठा नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात गेला महिनाभर…
चेन खेचल्याने वीस दिवसांत 98 गाड्यांना विलंब नाशिकरोड : प्रतिनिधी रेल्वेची विनाकारण चेन ओढण्यामुळे 1…
सध्या सुरू असलेल्या पहिलीपासूनच्या त्रिभाषा सूत्रासंदर्भात आपण सर्व मराठी बांधवांनी जाणून घ्यायला हवे आपल्या मराठी…
पारोळा : एका अनोळखी महिलेच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. यानंतर महिलेचा मृतदेह…
अभोणा ग्रामपालिकेचे दुर्लक्ष, कचरा डेपोसाठी जागा नसल्याचा जावईशोध अभोणा : प्रतिनिधी देशभर स्वच्छ भारत मिशनचा…