राहुड घाटात भीषण अपघात ,पाच प्रवासी ठार

काजीसांगवी: प्रतिनिधी

चांदवड जवळील राहुड घाटात बसचा भीषण अपघात होऊन पाच प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त होत आहे, आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाल्याचे समजते,

अपघाताचे वृत्त समजताच पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात येत आहे. एसटी आणि ट्रक यांचा हा अपघात झाला, मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात पाच ते सहा प्रवासी जागीच ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *