सुरगाणा तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते,ज्यामुळे उष्णतेची तीव्रता काहीशी कमी झाली होती,मात्र सायंकाळी चारच्या सुमारास गोंदुणे, उंबरठाण, सुरगाणा, वांगण सुळे, बा-हे, मनखेड, आळीवदांड, माणी व बोरगाव घाटमाथा परिसरात वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटात जवळपास अर्धा तास जोरदार पाऊस झाला, तालुक्यातील खिर्डी येथे वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने एका घराची पडझड झाली तसेच आळीवंदाड येथील जिल्हा परिषद शाळेचे वादळी वाऱ्याने पत्रे उडवून दिली आहे. मुलांना सुट्ट्या लागल्याने मोठा अनर्थ टळला आहे,या वादळी पावसामुळे काही ठिकाणी आंब्याची झाडे कोसळून पडली, तर विक्रीसाठी तयार झालेला आंबा खाली गळून अनेक शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे,
लग्न न करता एकत्र राहण्याचे (लिव्ह इन रिलेशनशिप) फॅड अलीकडे खूप वाढले आहे. विशेषतः शहरात…
नाशिक ः काल शेवटच्या श्रावणी सोमवारी रिमझिम पावसातदेखील जवळपास लाखभर शिवभक्तांनी श्री कपालेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी…
रहिवाशांमध्ये समाधान; नववसाहतींच्या विकासाला मिळाली नवी दिशा विंचूर : प्रतिनिधी विंचूरच्या मध्यवर्ती तीन पाटीपासून हाकेच्या…
नाशिक ः देवयानी सोनार आदिवासी समाजातील पेहराव, दागिने, दागिन्यांचे नक्षीकाम लोप पावत चालले आहे. नवीन…
हरकतींवरील सूचनांसाठीच्या कालावधीत मुदतवाढ नाशिक : प्रतिनिधी गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभागरचना तयार…
सिन्नर ः चौथ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून शहरासह तालुक्यातील भाविकांनी पुरातन गोंदेश्वराच्या चरणी माथा टेकवून…