जि. प. सीईओ मित्तल : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील धरण, तलावांतून पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त गाळ काढून सिंचनाची क्षमता वाढवावी. गाळयुक्त शिवारासाठी शेतकर्यांना प्रोत्साहित करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार या योजनेबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा जलसंधारण अधिकारी आर. एच. झुरावत, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे (रोहयो), भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला, सचिव दीपक चोपडा, जिल्हाप्रमुख ललित सुराणा, समन्वयक अशोक पवार उपस्थित होते. यावेळी या योजनेविषयी जनजागृती करणार्या चित्ररथांना मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखविला.सीईओ मित्तल यांनी सांगितले की, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेच्या माध्यमातून जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन करण्याची संधी मिळाली आहे. गाळामुळे जलसाठवणूक क्षमता कमी होते. जिल्हा जल आत्मनिर्भर करण्यासाठी जलसाठ्यांमधून गाळ काढणे, त्यांची निगा राखणे, पाण्याचा अपव्यय टाळून योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनातर्फे ही कामे केली जातील. समन्वयक पवार यांनी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देत गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.
बँकेची विशेष सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून गाजली नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची…
ग्रामीण भागात पुरुष अग्रेसर, शहरात मात्र अनास्था नाशिक ः प्रतिनिधी कुटुंबात एक किंवा दोन मुले…
शिंदे सेनेसह ठाकरे गट, मनसेचा पर्याय; नव्या समीकरणाकडे लागले लक्ष नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या…
मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…
वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…
मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्या प्रवाशांची…