वडाळागाव : प्रतिनिधी
प्रवाशाची रिक्षामध्ये विसरलेली सोन्याचे दागिने व रोकड असलेली बॅग प्रामाणिकपणे परत केली.
या प्रामाणिकपणाबद्दल मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या वतीने रिक्षाचालकाचा सत्कार करण्यात आला.
बडोद्याहून नयन पाटील हे पत्नीसह नाशिक येथे भावाला भेटण्यासाठी आले होते. दुपारी दीडच्या सुमारास नांदूर नाका येथून (एम.एच.15 ए.के.5990) या रिक्षातून मुंबई नाका येथील महामार्ग बस स्थानकात गेले. बसमध्ये बसल्यानंतर त्यांना बॅग रिक्षात विसरल्याची आठवण झाली. त्यांनी तातडीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ व कर्मचारी आकाश सोनवणे, दीपक जगदाळे, मनीषा सोनवणे, समाधान धिवरे आणि शोभा कडवे यांनी तपास सुरू केला. अल्पावधीतच रिक्षाचालक सुनील नरहरी गंधे (59, रा. जेल रोड) यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. बॅगसह पोलीस ठाण्यात येत बॅग सुपूर्द केली. बॅगमध्ये दोन सोन्याच्या पोत व रोख रक्कम असल्याचे पाटील कुटुंबीयांनी स्पष्ट केले.
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा पाहता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच, बॅग पुन्हा पाटील कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आली.
नाशिक: प्रतिनिधी राज्यातील आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, नाशिकचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने…
नाशिक: प्रतिनिधी सिन्नर तालुक्यात पावसामुळे एका शेतकऱ्याचा बळी गेल्याची घटना आज घडली. मौजे नळवाडी, ता.…
अंदमानही व्यापला; 7 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे : यंदा मॉन्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात…
चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेले मनमाड : प्रतिनिधी अंतापूर-ताहाराबादवरून देवदर्शन करून परतणार्या पिता-पुत्रावर काळाने घाला घातला.…
नाशिक : प्रतिनिधी इयत्ता 11 वी प्रवेशाच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, नाशिकमधून तब्बल 371 शाळा…
शहापूर ः प्रतिनिधी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअरस्ट्राइक केला. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतावर…