दूध, खाद्यतेल, इंधनाचे दर वाढले; भाजीपाल्याच्या भावात मोठी वाढ
नाशिक : प्रतिनिधी
गेल्या महिनाभरात महागाई वाढल्यामुळे नागरिकांच्या आर्थिक नियोजनावर ताण पडत आहे. भाज्या, दूध, खाद्यतेले व इंधनाचे दर वाढलेले आहेत. विशेष म्हणजे, दूध, दही, ताक, पनीर यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीतही वाढ झाली आहे. महागाईमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना दैनंदिन खर्च भागवणे कठीण होत चालले आहे.
नाशिक हा कांदा व भाजीपाला पिकविणारा जिल्हा असतानाही शहरातील बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सर्वसामान्य नागरिक म्हणत आहेत की, अत्यावश्यक वस्तू, किराणा, भाज्या, दूध, खाद्यतेल व इंधनाचे दर वाढल्यामुळे आमच्या खर्चात मोठी वाढ झालेली आहे. भाज्यांचे 10 ते 20 टक्के दर वाढले आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थ 5 ते 10 टक्क्यांनी वाढले. इंधन म्हणजे पेट्रोल, डिझेल 3 ते 5 टक्क्यांनी वाढले. सध्या भाज्यांचे भाव असे : कांदा 20 रुपये किलो, टोमॅटो 40 रुपये, बटाटे 30 रुपये, वांगे 100 रुपये, घेवडा 80 रुपये, मिरची 100 रुपये, गाजर 60 रुपये किलो, तसेच कोथिंबीर 20 रुपये जुडी, मेथी 20 रुपये जुडी. पालेभाज्यांचे भाव मात्र कमी झाले आहेत.
आता बाजारात गेले की, पैसे जास्त खर्च होतात. त्यामुळे जीवनमानावर ताण जाणवत आहे. एखादी वस्तू घेण्यासाठी आधीपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे. – कुणाल सांगळे, ग्राहक
गेल्या काही महिन्यांत बाजारात प्रत्येक वस्तूचे भाव वाढलेले दिसतात. आधी एक हजार रुपयांत आठवड्याची खरेदी होत होती. आता त्याच गोष्टीसाठी 1400 ते 1500 रुपये लागतात. वाढत्या महागाईमुळे माहिन्याच्या शेवटी बजेट हाताबाहेर जाते. त्यामुळे घरगुती जीवनावर ताण वाढत आहे.
– प्रिया बोडके, गृहिणीघर चालवणे आता खूप अवघड झाले आहे. महागाईमुळे खर्चात 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. सगळं खूप महाग झालं आहे. घर चालवणे कठीण होत आहे. आधीपेक्षा खर्च खूप वाढलाय. सामान्य माणसाने घर कसे चालवावे, असा प्रश्न पडला आहे. शहरातील वाढती महागाई ही केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक समस्या बनत चालली आहे.
– शंकर टाळकुटे, नागरिक
Rising inflation puts pressure on the financial planning of ordinary citizens