उत्तर महाराष्ट्र

सायखेडा गोदावरी पूल वाहतुकीसाठी धोकादायक

नाशिक : प्रतिनिधी
गोदावरी नदीवरील सायखेडा येथील पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून, या पुलावरुन केव्हाही वाहन कोसळू शकते. त्यामुळे या पुलावरुन वाहन चालवत असाल तर सावधान, असे म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे. या पुलावर तात्पुरते रिफ्लेक्टर न बसविल्यास शिवसेना स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायतीचे सदस्य अश्पाक शेख यांनी दिला आहे.
गोदावरीला नुकताच पूर येऊन गेला. त्यामुळे सायखेडा पुलावर असलेले लोखंडी गार्ड उघडे पडले आहेत.पाच ते सहा ठिकाणी पुलावर खटक्या पडल्या आहेत. या पुलावर दोन्ही बाजूंनी पुराचा गाळ साचला आहे. या पुलाला कठडे नसल्याने दुचाकी अथवा कार थेट नदीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे साईडपट्टया दुरुस्त करण्याबरोबरच कठडे अथवा लोखंडी रेलिंग बसविणे गरजेचे झाले आहे. परंतु प्रशासनाचा दुर्लक्षामुळे निष्पाप प्रवास करणार्‍या लोकांना इजा पोहोचत आहे. पुलाला असलेले लोखंडी कठडे सद्या प्रशासनाने काढून टाकले आहेत. त्यामुळे पुलावरुन दुचाकीस्वार रात्रीच्या अंधारात थेट नदीमध्ये कोसळू शकतो. त्यासाठी तात्पुरते रिफ्लेक्टर उभे करणे गरजेचे आहे जेणेकरून रात्रीच्या वेळेस पुलाच्या दोन्ही बाजू समजून येतील तातडीने उपाय योजना न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा सायखेडा ग्रामपंचायतीचे सदस्य अश्पाक शेख यांनी दिला आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

13 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

13 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

13 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

14 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

14 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

14 hours ago