मुकणेतील शेतकर्यांचे 10-12 लाखांचे नुकसान
मुकणे : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील शेतकर्यांच्या वाडीवर्हे शिवारातील गट नंबर 445, 446 व 447 मधील तोडण्यायोग्य व तोडून ठेवलेला ऊस विजेच्या तारांच्या घर्षणामुळे शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाला. या शेतकर्याचे जवळपास 10-12 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, महावितरण कंपनी व साखर कारखाना प्रशासनाने या शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. मुकणे येथील नारायण रघुनाथ राव, किसन रघुनाथ राव, गोपाळ पांडुरंग राव व भाऊसाहेब गणपत राव या शेतकर्यांचे वाडीवर्हे शिवारात उसाचे क्षेत्र आहे.
शेतकर्यांचा याच पिकावर वर्षभराचा घरखर्च व उदरनिर्वाह चालतो. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कारखाण्याकडून ऊस तोड होण्याची हे शेतकरी वाट पाहत होते त्यातील काही ऊस हा तोडून ठेवलेला होता मात्र लवकर ऊसतोड तर झालीच नाही.काही तोडलेला ऊस कारखान्याने लवकर न नेल्याने शेतातील लोंबकळणार्या तारांचा शॉर्टसर्किट होऊन तोडणीयोग्य असणारा एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकर्यांचे जवळपास 10-12 लाख रुपयांचे नुकसान झाले.
हे ही वाचा…
मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…
महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…
नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…
आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…
सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…
शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…