मुकणेतील शेतकर्यांचे 10-12 लाखांचे नुकसान
मुकणे : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील मुकणे येथील शेतकर्यांच्या वाडीवर्हे शिवारातील गट नंबर 445, 446 व 447 मधील तोडण्यायोग्य व तोडून ठेवलेला ऊस विजेच्या तारांच्या घर्षणामुळे शॉर्टसर्किट होऊन जळून खाक झाला. या शेतकर्याचे जवळपास 10-12 लाख रुपयांचे नुकसान झाले असून, महावितरण कंपनी व साखर कारखाना प्रशासनाने या शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. मुकणे येथील नारायण रघुनाथ राव, किसन रघुनाथ राव, गोपाळ पांडुरंग राव व भाऊसाहेब गणपत राव या शेतकर्यांचे वाडीवर्हे शिवारात उसाचे क्षेत्र आहे.
शेतकर्यांचा याच पिकावर वर्षभराचा घरखर्च व उदरनिर्वाह चालतो. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कारखाण्याकडून ऊस तोड होण्याची हे शेतकरी वाट पाहत होते त्यातील काही ऊस हा तोडून ठेवलेला होता मात्र लवकर ऊसतोड तर झालीच नाही.काही तोडलेला ऊस कारखान्याने लवकर न नेल्याने शेतातील लोंबकळणार्या तारांचा शॉर्टसर्किट होऊन तोडणीयोग्य असणारा एकर ऊस जळून खाक झाल्याने शेतकर्यांचे जवळपास 10-12 लाख रुपयांचे नुकसान झाले.
हे ही वाचा…
तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…
आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…
नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …
राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…
आयुक्तालय हद्दीत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सातपूर: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकार्यांच्या…