बहिणीचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना एकुलत्या एक भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सिन्नर तालुक्यातील दातली येथे ट्रॅक्टर पलटी होऊन १८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या दोनच दिवसांवर बहीणीचे लग्न येऊन ठेपले असल्याने सर्वत्र आनंदी आनंद असलेल्या घरात अचानक घडलेल्या दुर्घटनेने आश्रुंचे पाट वाहू लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.शुक्रवारी (दि.२०) दुपारी शेतात रोटावेटर मारून घरी परतत असताना चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला असलेल्या सहा फूट खोल चारीत कोसळला आणि पलटी झाला. यात चालकाच्या बाजूला बसलेला ओमकार चिंतामण चांदोरे (वय १८) याचा ट्रॅक्टरखाली दबून जागीच मृत्यू झाला.
मयत ओमकार चांदोरे याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद इप्पर, सचिन काकड करत आहेत.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…