जबाबदार कोण ?
नाशिक:
शहरात दीर्घ प्रतिक्षे नंतर मान्सुनचा पहिला पाऊस झाला .पहिल्या पावसाचा आनंद नागरिकांनी घेतला. मात्र पहिल्याच पावसात शहरात सराफ बाजार ,दहीपुल, हुंडीवाला लेन ,भद्रकाली या परिसरात प्रचंड पाणी साचल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक, व्यापारी वर्गाचे प्रचंड हाल झाले. पावसाच्या पाण्याने गटारीतले,नाततले पाणी तुंबुन रस्त्यावर आले. त्यामुळे महानगरपालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्याची साफसफाई केली नसल्याचे उघड झाले. पहिल्याच पावसात नाशिक तुंबल्याचे चित्र होते त्यामुळे नाशिकची पहिल्याच पावसात झालेल्या अवस्थेला कोण जबाबदार आहे असा सवाल उपस्थित होत आहे.
वीज गायब
पावसाच्या संतधारेनंतर शहरात विजेचा लंपडाव सुरू झाल्याने महावितरणवरण ही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
स्मार्ट सिटीची दुर्दशा
शहरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या अर्धवट स्वरूपातील कामामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना रस्त्यातून वाट काढणेही कठीण होऊन बसले होते.
हा पाहा व्हिडिओ:
अशोकनगरमध्ये १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ सिडको/ सातपूर: प्रतिनिधी : सातपूरच्या अशोकनगर परिसरात…
तिघांना अटक; घटना सीसीटीव्हीत कैद मालेगाव : प्रतिनिधी शहरातील जुना आग्रारोडवरील नानावटी पेट्रोलपंपाजवळ एका तरुणाची…
श्यामची आई उत्कृष्ट सिनेमा; शाहरूख खान, राणी मुखर्जीलाही पुरस्कार नवी दिल्ली : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची…
डॉ. नीलम रहाळकर यांचे रविवारी 'अरंगेत्रम्'; वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना नाशिक - विशेष प्रतिनिधी…
कळवण येथील भूमिअभिलेखचा लिपिक लाच घेताना रंगेहाथ नाशिक: प्रतिनिधी मोजणी केलेल्या जमिनीचा अहवाल देण्याच्या मोबडल्यात…
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…