मुंबई : ज्यांना जायचं आहे त्यांनी जा … असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले . वर्षावरून मातोश्रीकडे जाताना उद्धव ठाकरे असे बोलले आणि निघून गेले . उद्धव ठाकरे यावेळी भावुक झाल्याचे दिसून आले . त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रूप आल्याचं पाहायला मिळतंय . तिकडून काय सांगता तोंडावर सांगा , मी राजीनामा द्यायला तयार आहे , असे उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून म्हटले होते . जनतेशी तसेच बंडखोर आमदारांशी संवाद साधला . तुम्ही इकडे या आणि मला सांगा , मुख्यमंत्रिपदासाठी तुम्ही लायक नाही , मी लगेच राजीनामा देतो , असं उद्धव ठाकरे म्हणाले . त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला वर्षा बंगला आजच सोडणार असल्याचं जाहीर केलं . त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले . वर्षा निवासस्थान सोडताना त्यांनी एकच वाक्य उच्चारलं , ज्यांना जायचं आहे त्यांनी जा … असे म्हणाले आणि निघून गेले .
‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…
अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…
बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…
पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…
109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…
1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…