नाशिक

सोशल मीडिया, बेतालपणा आणि सायबर गुन्हा

कोणीतरी एक व्यक्ती अचानक येते, सोशल मीडियावर काहीतरी, कोणाबद्दल तरी लिहिते आणि प्रचंड वादंग सुरु होतो. मुळात हे का घडते? सोशल मीडिया फुकट आहे म्हणून ? कि कायद्याचा वचक नाही म्हणून ? कि आपण जे करतोय तो गुन्हा ठरू शकतो, याबाबत अजिबातच नसलेले ज्ञान?
उत्तर काहीही असो, सोशल मीडिया वर कोणीही कोणाही विषयी (अगदी कोणाही विषयी) आक्षेपार्ह लिहू, बोलू, टाकू शकत नाही. कोणाला शिवीगाळ करणे, व्यंगावर किंवा आजारावर बोलणे, अश्लीलता पसरवणे, चुकीची माहिती देणे, इत्यादी हे गुन्हा ठरू शकतात. मग ते नाव घेऊन असून किंवा फक्त बोलण्याचा रोख त्या व्यक्तीकडे असो. गुन्हा तो गुन्हाच. आणि ते सिद्ध करायला फार वेळ लागत नाही.
सोशल मीडिया वापरताना काळजी घेतली पाहिजे. मग तो सामान्य माणूस असो, नेता असो किंवा अभिनेता असो. कायदा सर्वांना समान आहे. त्यातल्या त्यात माहिती तंत्रज्ञान कायदे हे समानता दर्शवण्यासाठीच बनले आहेत. फक्त प्रत्येकवेळी तितक्याच ताकदीने कारवाई झाली पाहिजे.
खऱ्या आयुष्यात एखाद्याबद्दल कितीही मतभेत असतील, तरी त्या बद्दल सोशल मीडियावर अर्वाच्य आणि असंस्कृत भाषेत गरळ ओकणे हे चूकच आहे, आणि तो गुन्हाही आहे. पण, त्या पोस्टला पोस्ट करणाऱ्यापेक्षा इतर लोकच जास्त व्हायरल करतात, हे ही अत्यंत चुकीचे आहे.
मुख्य मीडियामध्ये अशा गोष्टी दाखवताना “ब्लर” करायच्या असतात, असा एक साधा नियम आहे. असो. सर्वांनी काहीही पोस्ट करताना अथवा बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे.
अनावधानाने पोस्ट करणे आणि नंतर ती काढून टाकणे, किंवा त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणे, हा आपण एक “अपघात” किंवा चूक समजू शकतो. पण जाणीवपूर्वक आणि नीट विचार करून एखाद्या व्यक्तीला टार्गेट करून “सायबर बुलिंग” करणे, हि सायबर विकृती आहे. सर्वांनीच थोडा विचार करणे गरजेचे आहे, आणि सायबर साक्षर होणे गरजेचे आहे.
– ओंकार गंधे (सायबर सुरक्षा तज्ज्ञ)
Bhagwat Udavant

Recent Posts

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला गती

मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्‍यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…

5 hours ago

जातो माघारी पंढरीनाथा…

महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…

5 hours ago

जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोर‘धार’; धरणांतून विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…

6 hours ago

सरदवाडी धरण ओव्हरफ्लो; भोजापूरच्या पूरचार्‍यांना सोडले पाणी

आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…

6 hours ago

किचन ट्रॉलीच्या कंपनीला भीषण आग

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…

6 hours ago

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…

7 hours ago