नाशिक

सप्तशृंगगडावर अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

85 लाखांचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सप्तशृंगगड परिसरात स्वच्छता व पर्यावरण संरक्षणासाठी नाशिक जिल्हा परिषदेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गड परिसरात अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे 85 लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे तांत्रिक मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी येतात. त्यामुळे स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गड परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प साकारण्यात येणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजन योजनेतून (सन 2025-2026) या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध केला जाणार आहे. संबंधित प्रकल्पासाठी एकूण 84 लाख 94 हजार 602 रुपयांचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी सादर करण्यात आला असून, ही मंजुरी लवकरच मिळण्याची दाट
शक्यता आहे.
मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. सप्तशृंगगड येथील भक्तनिवासाजवळील वनविभागाच्या जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गड परिसरातील सांडपाण्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन होणार असून, दूषित पाणी परिसरात साचण्याची समस्या कमी होईल. परिणामी, पर्यावरणीय समतोल राखला जाईल तसेच भाविक व स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे सप्तशृंगगड परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित व पर्यावरणपूरक होईल. भाविकांसाठी मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले.

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे फायदे

दूषित पाणी नद्या व जलस्रोतांमध्ये जाण्यापासून प्रतिबंध, रोगराई कमी होण्यास मदत.
शुद्ध केलेले पाणी बागकाम व स्वच्छतेसाठी वापरण्याची सुविधा,
र्यावरण संरक्षण व स्वच्छतेत सुधारणा
प्रकल्प सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वीच कार्यान्वित करण्याचा प्रयत्न

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पडोसन

पडोसन नावाचा विनोदी चित्रपट तुम्हाला सगळ्यांना आठवत असेलच.... एक -एक पात्र अतिशय विनोदी... तर अशीच…

4 hours ago

फुलोरा…

‘फार फार तर वारा बाहेरून येईल पण फुलून तर आतूनच यावे लागते..’ कविवर्य संजय चौधरी…

4 hours ago

श्रद्धा, ट्रेंड आणि माणूस

नुकताच फेसबुकवरील एका पेजवर डॉ. प्रज्ञावंत सरांचा लेख वाचनात आला. त्यांच्या लेखातील काही मुद्दे मनाला…

4 hours ago

आवडता कोपरा

खुणावतो का मला माहेरचा तो कोपरा, जरी असला आज, माझा संसार हसरा.... बंद कुपी असते…

4 hours ago

खंजीर आणि खाज

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तत्त्वांचा बाजार आणि सोयीच्या युतींचा सुकाळ झाला असून, एकेकाळचे कट्टर विरोधक आता…

5 hours ago

बांगलादेशमधील सत्तांतर

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल घडला आहे. बांगलादेशमधील नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत दीर्घकाळ…

5 hours ago