नाशिक

नायलॉन मांजाचा जीवघेणा खेळ थांबवा

 

सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास इंगळे यांचे आहावन

नाशिक : प्रतिनिधी

शहरात नुकतीच संक्रात झाली. मात्र यावेळीही नेहमीप्रमाणे बंदी केलेला व घातक असलेला नायलॉन मांजाचा बेसुमार वापर करताना अनेकजन दिसून आले. शहरातील गच्या, मैदानांवर हा घातक नायलॉन बिनधास्त वापरला जात होता. मात्र हा मांजा आता पक्षांच्या जीवावर बेतत आहे. शहरातील विविध भागात नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी होत आहे. त्यामुळे नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कायमस्वरुपी कठोर कारवाइ करून अशा व्यक्तींवर संक्रात आणावी. अशी मागणी नाशिकरोड येथील सामाजिक कार्यकर्ते तुळ्शीदास इंगळे यांनी केली आहे.

 

हौसेपोटी अनेकजन पंतग उडवत असले तरी,आपल्या एका कृतीने नागरिक व पशु पक्ष्यांवर काय परिणाम होतो आहे. याचा विचार नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांनी आणि तो वापरणाऱ्यांनी याचा विचार करायला हवा. शासनाकडून संक्रात च्या वेळी काही ठिकाणी कारवाइ केली जाते. मात्र सरसकट नायलॉन मांजा हद्दपार होत नसल्याचे दुर्दैवी चित्र पाहवयास मिळत आहे. त्यामुळे आता मांजाविरोधात लोकचळ्वळ व्हायला हवी. यासाठी विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घ्यावा. प्रत्येक शाळा, महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जनजागृती होणे महत्वाचे आहे. सध्या याविषयी केवळ पर्यावरण, वन्यजिव प्रेमी यांच्याकडूनच प्रयत्न होताना दिसतात. या चळ्वळीत सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होणे असल्याचे मत इंगळे यांनी केले आहे. दरम्यान मकरसंक्रांत झाल्यानंतरही शहरातील नाशिकरोड, जेलरोड सह सर्व शहरात पतंग कटल्यानंतर हा मांजा अद्यापही झाडे, तारा, गच्चीवर लोंबकळत दिसतो आहे. त्यात पक्षी अडकून जखमी होत आहेत. काही ठिकाणी प्राणी, नागरिक जखमी देखील जखमी झाल्याच्या घटना शहरात घडल्या. शनिवारी लहान मुलगा याच मांजामुळे जखमी झाल्याचा प्रकार घडला. प्रशासनाने या मांज्यावर नियंत्रणासाठी कठोर होउन कडक अंमलजबाजवणी करावी. नायलॉन मांजावर महाराष्ट्रासारख्या एकट्या राज्यात बंदी घालून उपयोग नाही. तर देशभरात त्याच्या उत्पादनावरच बंदी घालावी. अशी मागणी तुळशीदास इंगळे यांनी केली आहे.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago