महाराष्ट्र

मनमाड-मुंबई समर एक्सप्रेस मध्येभाजीपाला लोडसाठी वेळ वाढली

मनमाड-मुंबई समर एक्सप्रेस मध्ये भाजीपाला लोड करण्यासाठी मिळाला तीन मिनिटांचा अतिरिक्त वेळ

वेळ वाढवण्याच्या मागणीला अनेक संघटनांना यश

शेतकऱ्यांना मिळाला दिलासा

लासलगाव प्रतिनिधी

मनमाड पासून सुटणाऱ्या सीएसएमटी स्टेशन मुंबई पर्यंत जाणाऱ्या 02102 क्रमांकाची ट्रेन लासलगाव येथे एक मिनिट थांबत होती त्यामुळे भाजीपाला आणि शेतमाल लोडिंग साठीचा परवाना लासलगाव स्टेशन वरून मिळत नव्हता.सदरच्या बाबीमुळे अनेक व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना त्यांचा माल मुंबईकडे घेऊन जाता येत नव्हता.रेल्वे थांबण्याची वेळ ही एक मिनिटापासून वाढून तीन मिनिटे केल्यास भाजीपाला वाहतुकीचा परवाना मिळू शकतो म्हणून गेल्या काही दिवसांपासून याबाबत अनेक संघटना रेल्वे प्रशासनाकडे तसेच केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्याकडे मागणीचा पाठपुरावा करत होत्या त्या मागणीला यश आले आणि रेल्वे प्रशासनाने सदर रेल्वेची थांबण्याची वेळ ही तीन मिनिट केली त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापारी आणि शेतकरी लासलगाव कडून मुंबईकडे भाजीपाला आणि शेतमाल पाठवू शकतील.

 

 

 

या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस कृषीतज्ञ सचिन आत्माराम होळकर व्यापारी,संघटनेचे बाळासाहेब सोनवणे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर तसेच केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांच्याकडे प्रयत्न आणि पाठपुरावा केला.सदर पाठपुरावाला यश आले.या कामी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे देखील मदत घेण्यात आली.

 

 

 

या प्रसंगी मागणीकर्त्यांनी शेतमालाचे पूजन करून लोडिंग केले.या वेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सचिन होळकर,माजी पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना नेते शिवा सुरासे,राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर गावडे,व्यापारी असोसिएशनचे बाळासाहेब सोनवणे,शिवाजी शिंदे,हरीश गवळी,हमीद शेख,प्रेम सोनवणे,रेल्वे प्रशासन आरसीएफ गवई,स्टेशन मॅनेजर पांडे,पार्सल पर्यवेक्षक जोशी आदी उपस्थित होते.सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार तसेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मानसपुरे यांचे सचिन होळकर यांनी दूरध्वनीद्वारे आभार मानले.

 

 

Devyani Sonar

देवयानी सोनार या 2018 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. दैनिक पुढारी मधून त्यांनी पत्रकारिता सुरू केली, सध्या त्या दैनिक गांवकरी मध्ये उपसंपादक तसेच ऑनलाइन कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक तसेच जिल्हा परिषद , सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. बीकॉम तसेच एम ए अर्थ शास्त्र यात पदयुत्तर पदवी मिळवली आहे. पत्रकारितेत अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

8 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

8 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

8 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

8 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

9 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

9 hours ago