निफाड तालुक्यात नवीन गट व गण रचनेनुसार होणार आगामी निवडणुका
निफाड : विशेष प्रतिनिधी
न्यायालयाच्या निर्णयानंतर आता जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, ग्रामीण भागात आपले राजकीय वर्चस्व अधोरेखित करणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी जोर धरू लागली आहे. नव्या गट-गण रचनेनुसार आगामी निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांनी गट व गणाचे मागील काही वर्षांचे आरक्षण गृहीत धरून लोकांच्या भेटीगाठींवर भर देत साखर पेरणी सुरू केली आहे. त्यातून निवडणुकीपूर्वीच मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीची वातावरणनिर्मिती सुरू झाल्याचे
चित्र आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांनी ग्रामीण भाग ढवळून निघतो. अलीकडे तरुणांचाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे मोठा ओढा आहे. ग्रामीण भागातील नेतृत्व सिद्ध करण्याची जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक हे एक साधन तरुणांसाठी उपलब्ध आहे. निवडणुकीत आपल्याला संधी मिळाल्यास आपलाच पत्ता कसा ओपन होईल, यासाठी अनेक जण धडपडताना दिसत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तीन-चार वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप या पक्षांत बर्याच राजकीय उलथापालथी झाल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीला पक्षातील ज्येष्ठ, युवा नेतृत्वाला सामोरे जावे लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्हा परिषद गट आणि गणांत देखील इच्छुकांची तयारी जोरात सुरू आहे. तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये राजकीय वारसदारांचे काय होणार याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
गट-गण रचनेसाठी सूचना
जिल्ह्यातील गट व गण रचनेसाठी शासनाने सूचना जारी केली असून, नियोजन असे : प्रारूप गट-गण रचनेची अधिसूचना प्रसिद्धी- 14 जुलै 2025 पर्यंत. प्रारूप गट-गण रचनेला हरकती- 21 जुलै 2025 पर्यंत. विभागीय आयुक्तांना हरकतींचा प्रस्ताव सादर करणे- 28 जुलै 2025 पर्यंत. विभागीय आयुक्तांकडे हरकतींवर सुनावणी- 11 ऑगस्ट 2025 पर्यंत. अंतिम गट-गण रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोगाला सादर करणे- 18 ऑगस्ट 2025 पर्यंत.
गट-गण निश्चित होण्याची शक्यता
साडेतीन वर्षांपासून लांबलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेला अखेर प्रारंभ झाला आहे. राज्याचे ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी राज्यपालांच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकार्यांना गट, गण प्रारूप रचना करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार सर्व जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी 18 ऑगस्टपर्यंत गट-गण रचना निश्चित करून राज्य निवडणूक अधिकारी यांना पाठवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आरक्षण निश्चिती होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.
गंगापूर धरणात दीड टक्क्याने पाणीसाठ्यात वाढ नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात मे महिन्यात व जूनच्या पहिल्या…
‘सलीम कुत्ता’वरून आकांडतांडव ते प्रवेशासाठी पायघड्या नाशिक : गोरख काळे मागील काही दिवसांपासून सुधाकर बडगुजर…
पावसाळ्यात कपड्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण दमट हवामानामुळे कपड्यांना वास येणे, बुरशी येणे…
काळ बदलला, नजर का नाही? एक स्त्री जेव्हा विधवा होते, तेव्हा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटतं,…
सहा लिंबांचे लोणचे. तीन लिंबांचा रस काढायचा. उरलेली तीन लिंबे चिरून बिया काढून घट्ट झाकण्याच्या…
खा. वाजे यांची महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांशी चर्चा नाशिक : प्रतिनिधी नाशिकरोड ते द्वारका उड्डाणपुलाचे रखडलेले…