सर्वतीर्थ टाकेद: शाहबाज शेख
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत मायदरा धानोशी ठोकळवाडी येथील ग्रामस्थांना गेली अनेक वर्ष उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हातानात दहा ते बारा किलोमीटर ची पायपीट करावी लागत आहे
इगतपुरी पंचायत समिती कडून टँकरद्वारे पाणीपुरवठा करत येथील ग्रामस्थांची तहान भागवण्यात आली असून दरवर्षी जाणवणाऱ्या या पाणीटंचाई उपाययोजना करण्यात येऊन कायमचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सरपंच पुष्पा बांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे इगतपुरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मायदार धानोशी येथील जवळपास साठ ते सत्तर कुटुंब असलेल्या ठोकळवाडीतील महिलांना दरवर्षी जानेवारी महिन्यापासून ते जून महिन्याच्या शेवटपर्यंत डोक्यावर हंडा घेऊन दूर अंतरावरून पाणी मिळेल तिथून आणायला लागते त्यासाठी मैलोनमैल प्रवास करावा लागत आहे ग्रामपंचायत प्रशासनाने व विद्यमान जिल्हा परिषद सदस्यांनी गत वर्षी ठोकलवाडीत पाण्यासाठी दोन हात पंप दिले परंतु त्या हातपंपनी पूर्ण तळ गाठल्याने एकाच हात पंपवर संपूर्ण ठोकळवाडी तेथील ग्रामस्थ नंबर लावून पाणी भरतात या हात पंपपानी तळ गाठल्याने दर अर्ध्या तासाला एक हंडाभर पाणी मिळते पाण्यासाठी सर्व गावकरी हंडा , कळशी, भांडी यांनी नंबर लावून ठेवतात घरी निघून जातात एकमेव पर्याय पण त्यालाही पाणी नसल्याने दिवस-रात्र हा पंप सुरू असतो परंतु यातून पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे
दरवर्षी उन्हाळ्यात चार-पाच महिने वाडीतील महिलांना कायमस्वरूपी डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे ही परिस्थिती वर्षानुवर्षे अशी चालू आहे या पार्श्वभूमीवर सरपंच व ग्रामविकास अधिकारी नितेश हेबाडे यांनी गटविकास अधिकारी डॉ.लता गायकवाड यांची भेट घेत पाणी टँकर च्या मागणीचा प्रस्ताव दिला होता त्यांच्या या मागणीला यश आले असून इगतपुरी पंचायत समितीकडून पाणीपुरवठा करण्यात आला आहे
दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र एकमेव असलेल्या हातपंप नंबर लावून वेळ खर्च करून रात्रीअपरात्री जीव धोक्यात घालून पाणी भरावे लागते आहे पाणी टंचाई व शासनाच्या वतीने कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात येऊन पाणीप्रश्न कायमचा सोडण्यात यावा
पुष्पा बांबळे
सरपंच
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…