महाराष्ट्र

पानेवाडीत इंधन चोरीचे रॅकेट उघड

रेल्वे कर्मचारीच सहभागी, सर्वत्र खळबळ
मनमाड: नरहरी उंबरे
इंधन कंपन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पानेवाडी शिवारात असलेल्या आव्हाड वस्ती येथील एका घरातून चाळीस लिटर डिझेल आणि 75 लिटर पेट्रोल रेल्वे सुरक्षा बल पथकाने जप्त केले. याप्रकरणी रेल्वे कर्मचारी आणि अन्य एकास ताब्यात घेतले आहे. रेल्वे कर्मचाऱ्याचा यात सहभाग असल्याने इंधन चोरीचे मोठे रॅकेट येथे सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पाने वाडी येथून संपूर्ण देशभरात इंधन पूरवठा केला जातो. या कंपन्यांच्या प्रकल्पज्वल रेलवे वॅगन भरण्यासाठी रेल्वेचे स्वतंत्र टर्मिनल आहे इंधनाची वॅगन रिकामी झाल्यानंतर तळाला शिलक राहिलेले इंधन कॅन मध्ये भरून ते बाहेर विकले जात होते. अशी गुप्त माहिती मनमाड रेल्वे सुरक्षा बलच्या पथकाला समजली होती. त्यानुसार काल सापळा रचण्यात आला. या सापळ्यात विजय दशरथ सांगळे आणि विठ्ठल रामचंद्र सांगळे हे दोघे अडकले. विशेष म्हणजे विठ्ठल सांगळे हा रेलवे कर्मचारी च या रॅकेट मध्ये सहभागी असल्याने कुंपनच शेत खात होते. पोलिसानी दोघांना अटक करण्यात आली आहे. सहायक आयुक्त बी पी कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी अधिकारी डी के मिश्रा, उपनिरीक्षक आर, एस यादव, सागर वर्मा, मनीष कुमार यांनी ही कारवाई केली,

संगनमताने डल्ला

पाने वाडी येथील इंधन कंपन्यांच्या साठवणूक केंद्रातून दररोज रेल्वे वॅगन द्वारा तीन ते चार रॅक ठीक ठिकाणी पाठवले जातात या वगन मधून हे इंधन चोरी होत होते रेल्वे वॅगन चे व्हॉल्व उघडून त्यातून संगनमताने इंधनावर डल्ला मारण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे त्यामुळे या दोघांना अटक झाल्यानंतर आता यातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे,

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

अधिक मासातील अधिक विचार

‘वर्षामागूनी वर्ष सरती ऋतू मागूनी ऋतू’ या गाण्याच्या ओळीप्रमाणे ऋतू चक्र फिरत असते. महिने, वर्ष…

17 minutes ago

मरण स्वस्त आणि जगणं महाग

अनेकांना वाटतं की, पेट्रोल-डिझेल महागलं की फक्त स्वतःची गाडी असणार्‍यांनाच फटका बसतो. पण हे अर्थशास्त्र…

36 minutes ago

खरंच!.. काय होते ते दिवस….

बालपण म्हणजे जणू सुंदर स्वप्न. जे जगताना कधी कळत नाही, पण नंतर आठवलं की डोळे…

43 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात रिक्षाचालकांची मुजोरी

पोलिसांचा कानाडोळा; वाहतूक कोंडीत भर नाशिक : प्रतिनिधी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी मोहीम शहर…

52 minutes ago

जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र

109 गावे, 238 वाड्यांना टँकरद्वारे पाणी नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची समस्या अधिक…

1 hour ago

अवकाळीचा नाशिक विभागाला सर्वाधिक फटका

1.46 लाख शेतकरी बाधित, 145.87 कोटींची मदत मंजूर नाशिक : प्रतिनिधी मार्च 2026 मध्ये झालेल्या…

1 hour ago