शिवाजीवाडी येथील युवकाच्या मृत्यूनंतर परिसरात तणाव; दवाखान्यात रात्री उशिरापर्यंत जमाव
जुने नाशिक : वार्ताहर
वडाळा रोडवरील शिवाजी वाडी येथे काल (दि.१०) रात्री घाबरून पळ काढत असताना जमिनीवर कोसळून एक युवक गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याला बेशुद्धावस्थेत दवाखान्यात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेनंतर वडाळा रोडवरील एका खाजगी रुग्णालयाच्या आवारात रात्री उशिरापर्यंत शेकडोंचा जमाव जमला होता. तसेच मोठी गर्दी उसळली होती. यावेळी मुंबई नाका पोलीस ठाणे व भद्रकाली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा फौज फाटा परिस्थितीवर लक्ष ठेवून होता. या घटनेत रवींद्र मारुती भांगरे (२५) हा युवक मृत पावला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान शिवाजी वाडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती काही बघ्यांनी दिली आहे.
जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…
कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…
गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…
मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…
410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…
मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…