नाशिक

मुख्यमंत्र्यांना कचरा गोळा करण्याची सवय

 

 

खा. संजय राउतांची घणाघाती टीका

 

 

नाशिक : प्रतिनिधी

भाजपाला छत्रपती शिवाजी महारांजाबद्दल कधीच प्रेम नव्हते. जेव्हा छत्रपतींचा अपमान झाला त्यावेळी यांची वाचा गेलेली असते. तसेच शिंदे गटाला कचरा गोळा करायची सवय, कचऱया समोर मुख्यमंत्री भाषण करतात. ठाकरे गटातून शिंदे गटात जाणारे चोर, लफंगे आणि कचरा असल्याची घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राउत यांनी शिंदे गटावर केली.

शुक्रवारी खा. राउत नाशकात दाखल झाले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातून आउटगोइंग वाढून शिंदे गटात इनकमींग सुरु झाल्याने या पार्श्वभूमिवर खा. राउत नाशिक दौर्‍यावर आल्याने यास महत्व प्राप्त झाले आहे. विशेषत: खा. राउत शुक्रवारी नाशिक दौर्‍यावर येण्याआधीच सकाळी तब्बल पन्नासहून अधिक शिवसेना पदाधिकार्‍यांनी मुंबइत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश झाला. हे प्रवेश शिंदे गटाचे सचिव व ठाकरे गटात असताना राउतांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाउसाहेब चौधरी व माजी विरोधी पक्षनेते यांनी घडवून आणल्याचे बोलले जात आहे. नाशकात येताच खा. राउत यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, समृद्धीच्या टक्केवारीतुन पक्ष बनत नाही, पक्ष हा रक्त घामातुन बनत असल्याची जळ्जळीत टीका यावेळी त्यांनी केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाच लाख कोटींची गुणतवणुक महाराष्ट्रातुन नेता आणि आमच बिर्‍हाड जर्मणीला गुणतवणुक आणण्यासाठी जात असल्याची टीकाही राउतांनी यावेळी केली.

नारायण राणेंना उत्तर दिल्या पासुन त्यांनी माझी ओळख देण बंद केले. हे त्यांच्या प्रकृत्ती साठी चांगल असल्याचा टोला त्यांनी राणे यांना लगावला. त्यांनी माझ्यांशी ओळख काढण्याचा प्रयत्न केला तर माझ नाव संजय राऊत आहे , राणे तुम्ही गुंड,तर मी महागुंड , कुठे येवु, मी कुणालाही घाबरणार नाही, कुठल्याही एजंन्सीला घाबरत नाही. नाशिक शहरामधुन शिंदे गटात गेलेल्या मध्ये एखाद दुसर नाव परिचयाच असेल मात्र इतर कोण आहेत. हे आम्हाला माहिती नाही.

 

 

 

खा. राउत पदाधिकार्‍यांशी साधणार संवाद

 

नाशिक शहराचा आजवर असलेला ठाकरे गटाचा अभेद गडाला मागील महिन्यापासून सुरुंग लागला आहे. एकएक करुन माजी नगरसेवक आणि पदाधिकारी पक्षाला सोडचिट्ठी देत शिंदे गटात जाणे पसंत करत आहे. पक्षाची आणखी पडझड होउ नये याकरिता खा. संजय राउत यांनी पुन्हा नाशिकला येत पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहे. यासह पदाधिकार्‍यांचा मेळावाही ते घेणार आहे.

 

 

 

Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

23 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

23 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

23 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

23 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

24 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

24 hours ago