नाशिक

‘बहारो फुल बरसाओ’ची क्रेझ कायम

नाशिक : अश्‍विनी पांडे
लग्नसोहळ्याचे स्वरूप काळानुरूप बदलले. पूर्वीच्या काळी साधेपणाने होत असलेले विवाह आता मोठ्या धुमधडाक्यात होत आहेत. काळानुरूप बदल होणे स्वाभाविक आहे. पूर्वी लग्नाची वरात बॅण्डबाजाने पूर्ण होत होती. आता मात्र बॅण्डबाजासोबत डीजेही लावण्यात येतो. असे असले तरी एक गोष्ट मात्र तशीच आहे, ती म्हणजे लग्नात नवरी, नवरदेवाच्या आगमनाला लावण्यात येणारी गाण्याची धून.
‘बहारो फुल बरसाओ’ ही धून वर्षानुवर्षे लग्नात वाजविण्यात येते. 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या सूरज चित्रपटाला आता 56 वर्षे झाले. या चित्रपटातील ‘बहारो फुल बरसाओ’ हे गाणे राजेंद्र कुमार आणि वैजयंती माला यांच्यावर चित्रित झाले आहे. तर या गाण्याचे गीतकार हसरत जयपुरी आहेत. तर शंकर जयकिशन यांनी गाणे संगीतबद्ध केले आहे. मोहम्मद रफी यांच्या बहारदार आवाजाने गाणे स्वरबद्ध झाले आहे.
हे गाणे आजही लोकप्रिय आहे. लोकप्रिय नसून, प्रत्येक लग्नात वधू-वरांचे विवाहस्थळी आगमन याच धूनने होते. ‘बहारो फुल बरसाओ’ या अजरामर गाण्याने प्रत्येकाच्या आयुष्याच्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अनेक चित्रपटांत विवाह प्रसंगावर गाणे चित्रित झाले आहे. ती गाणी त्या त्या वर्षीच्या विवाह सोहळ्यात वाजविली जातात. मात्र, असे असले तरी या गीताची क्रेझ आजही कायम आहे. लग्नात वाजविणे हे गीत बंद झाले नाही. त्यामुळेच या गाण्याच्या निर्मितीला 56 वर्षे झाले असले तरी आजही गाण्याची क्रेझ कायम असल्याचे चित्र आहे.

Bhagwat Udavant

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

दादांची अकाली एक्झिट ! जिल्हा शोकसागरात

सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…

10 hours ago

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

10 hours ago

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा आत्मघातकी निर्णय

बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…

11 hours ago

अजितदादांची साथ नेहमी स्मरणात राहील!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…

11 hours ago

पवार परिवारावर आघात

महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…

11 hours ago

मीठसागरे शिवारात बिबट्या मादी जेरबंद

सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…

11 hours ago