वन खात्याला जाग आली




ञ्यंबकेश्वर:

ञ्यंबकेश्वर शहराच्या नजीक असलेल्या पिंपळद येथे गुरूवारी सायंकाळी बिबटयाच्या हल्ल्यात लहान मुलगी ठार झाली व त्यानंतर वन खात्याला जाग आली.मागच्या काही महिन्यांपासून बिबटया पिंपळद आणि पंचक्रोशीत दर्शन देत आहे.सप्टेंबर 2022 च्या दरम्यान दुगारवाडी येथे दोन वेळा लहान मुलांवर हल्ला झाला.त्यानंतर धुमोडी,वेळूंजे आणि मागच्या काही दिवसांपूर्वी ब्राह्मणवाडे येथे घराच्या दरवाजातुन लहान मुलांना उचलले.काल गुरवारच्या घटनेत तर मोठी बहिण सोबत असतांना मागच्या मागे लहान मुलीवर झडप घातली.या प्रकाराने तालुका हादरला आहे.वनखात्याच्या कार्यालयास टाळे ठोकण्याची भाषा सामाजिक आणि राजकीय पदाधिकारी बोलत आहेत.

गुरुवारी पिंपळद शिवारात घटनेच्या तासभरात वनखात्याची यंत्रणा हालली आणि तातडीने पिंजरे रवाना करण्यात आले.शुक्रवारी दुपार पर्यंत पिपंळद शिवारात वन खात्याच्या कर्मचा-यांनी छावणीचे स्वरूप आणले होते.वनपरिक्षेत्र अधिकारी दर्जाच्या सहा व्यक्ती येथे दाखल झाल्या होत्या.त्यांच्या सोबत कर्मचा-यांचा मोठा फौजफाटा देखील होता.घटना घडली तेथे एक पिंजरा ठेवण्यात आला आहे.त्या व्यतिरिक्त आणखी पाच पिंजरे जागोजाग ठेवण्यात आले आहे.

दुपारी ड्रोन कॅमेरा आणला होता.त्या अधारे संपुर्ण पंचक्रोशीचे स्कॅनींग करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.तसेच घटनेच्या परिसरात सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रात्रीच्या अंधारात प्राण्यांची होणारी हालचाल टिपण्याची क्षमता त्यांच्यात आहे.दोन डार्ट गन धारी येथे तैनात करण्यात आले आहेत.बिबटया दिसताच त्याला बेशुध्द करण्यात येईल.

दरम्यान नदी खो-यांमध्ये पकडलेले बिबटे वनखाते ब्रह्मगिरी परिसरात आणून सोडतात.मात्र त्यांना भक्ष म्हणून असलेले वन्यजीव नामशेष झाले आहेत.जंगल शिल्लक राहीलेले नाही.मोठया प्रमाणात बांधकाम आणि उत्खनन,सपाटीकरण झालेले आहे.त्यामुळे बिबटयांना आणि अन्य वन्यजीवांना निवारा राहीलेला नाही.तशात मानवी वस्तीकडे बिबटे कोबंडया कुत्री यासाठी येत असतात.वनखात्याने प्रथम तृणभक्षी वन्यजीव उपज वाढविण्यासाठी प्रयत्न करणे,महसुल विभागाने रानावनात बांधकाम,सपाटीकरण यासाठी बंधने घालणे,वनखात्याच्या जमीनी लगत असलेल्या खासगी जमींनीसाठी बिगरशेती करणे,सपाटीकरण,बांधकाम,उत्खनन यावर कठोर निर्बंध घालण्याची आवश्यकता असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणने आहे.

बिबट्याचा धसका घेतलेल्या गावोगावच्या ग्रामस्थांनी रानोमाळ गवत पेटवण्याचा धडाका सुरू केला आहे.त्यामुळे सर्वत्र धूर दिसत आहे.तसेच रात्रीच्या वेळेस आगीने वेढलेले शिवार नजरेस येत आहे.बिबट्या पासून संरक्षण करण्याचा उपाय लोकांनी आपल्या परीने योजला आहे.मात्र त्यामुळे वणवा लागत असून वनस्पती वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत.

ञ्यंबकेश्वर शहरात बिल्वतीर्थ तलाव आणि निलपर्वत परिसरात बिबटयाचा वावर वाढला आहे.याबाबत ञय्ंबकेश्वर परिक्षेत्र वनखाते आणि ञ्यंबक नगर पालिका यांना कळवले आहे.मात्र अद्याप पर्यंत त्याकडे लक्ष दिलेले नाही.नगर पालिकेने निलपर्वत आणि बिल्वतिर्थ रिंगरोड परिसरातील बंद असलेले पथदीप सुरू करावेत अशी वारंवार मागणी करण्यात आली आहे.मात्र प्रशासनाने त्याबाबत दुर्लक्ष केले आहे.

Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

17 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

17 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

17 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

17 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

18 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

18 hours ago