नाशिक

मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधीच गद्दारांच सरकार कोसळेल

नांदगाव येथील शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांचे भाकीत
नांदगांव : प्रतिनिधी
        मंत्रिमंडळाचा विस्तार होणे आधीच हे गद्दारांच सरकार कोसळेल  असं वक्तव्य आदित्य ठाकरे केले आहे  नांदगाव येथे आयोजित केलेल्या  शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने ते नांदगाव दौऱ्यावरआले होते जैन धर्म शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते
       यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जगन्नाथ धात्रक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  गणेश धात्रक नरेंद्र दराडे, अल्ताफ खान,संतोष गुप्ता कुणाल दराडे, माजी आमदार राजाभाऊ देशमुख अद्वय हिरे शशिकांत मोरे अशोक जाधव आधी व्यासपीठावर उपस्थित होते, यावेळी गणेश धात्रक यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना माझ्याकडे खोके नाहीत मात्र सर्व काही ओके आहे असा खोसक खोसतोला आमदार सुहास कांदे यांचे नाव न घेता लगावला तर अंबादास दानवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 24000 शेतकरी 2020 च्या पिक विमा पासून वंचित असून पिक विमा मिळून देण्यासाठी मुंबईत आंदोलन करण्याचे वेळ आली तरी करणार असल्याचं सांगत पुढील येणाऱ्या काळात कांदे बाहेर फेकले जातील असा टोला आमदार सुहास कांदे यांचे नाव न घेता लगावला
   येत्या दोन ते तीन महिन्यात गद्दारांच सरकार कोसळणार असं भाकीत देखील त्यांनी यावेळी केलं ते सरकार घटनाबाह्य आहे स्वतःला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्ली वारी करतात उद्धव ठाकरे यांच्या पाठीवर गद्दारांनी वार केले त्या गद्दारांना त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला आम्ही शून्यावर गेलो तरी शंभर आमदार निवडून आणून दाखवू असे सांगत  महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला हलवले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे हेच कळत नाही पाच ते सहा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर महाराष्ट्र राज्यातील तरुणांचा विचार करायला सरकार तयार नाही
        महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाही इतर ठिकाणी उधळपट्टी करण्यासाठी पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मात्र आता काही व्यक्ती आयत्या पिठावर रेगा ओढताना दिसून येत आहेत मला आपले आशीर्वाद हवे आहेत ते आपण द्यालच अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली,
Ashvini Pande

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

10 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

10 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

10 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

10 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

11 hours ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

11 hours ago