नाशिक

मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधीच गद्दारांच सरकार कोसळेल

नांदगाव येथील शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांचे भाकीत
नांदगांव : प्रतिनिधी
        मंत्रिमंडळाचा विस्तार होणे आधीच हे गद्दारांच सरकार कोसळेल  असं वक्तव्य आदित्य ठाकरे केले आहे  नांदगाव येथे आयोजित केलेल्या  शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने ते नांदगाव दौऱ्यावरआले होते जैन धर्म शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते
       यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जगन्नाथ धात्रक विरोधी पक्षनेते अंबादास दानवे  गणेश धात्रक नरेंद्र दराडे, अल्ताफ खान,संतोष गुप्ता कुणाल दराडे, माजी आमदार राजाभाऊ देशमुख अद्वय हिरे शशिकांत मोरे अशोक जाधव आधी व्यासपीठावर उपस्थित होते, यावेळी गणेश धात्रक यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना माझ्याकडे खोके नाहीत मात्र सर्व काही ओके आहे असा खोसक खोसतोला आमदार सुहास कांदे यांचे नाव न घेता लगावला तर अंबादास दानवे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 24000 शेतकरी 2020 च्या पिक विमा पासून वंचित असून पिक विमा मिळून देण्यासाठी मुंबईत आंदोलन करण्याचे वेळ आली तरी करणार असल्याचं सांगत पुढील येणाऱ्या काळात कांदे बाहेर फेकले जातील असा टोला आमदार सुहास कांदे यांचे नाव न घेता लगावला
   येत्या दोन ते तीन महिन्यात गद्दारांच सरकार कोसळणार असं भाकीत देखील त्यांनी यावेळी केलं ते सरकार घटनाबाह्य आहे स्वतःला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्ली वारी करतात उद्धव ठाकरे यांच्या पाठीवर गद्दारांनी वार केले त्या गद्दारांना त्याची किंमत मोजावी लागेल असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला आम्ही शून्यावर गेलो तरी शंभर आमदार निवडून आणून दाखवू असे सांगत  महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला हलवले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे की गुजरातचे हेच कळत नाही पाच ते सहा प्रकल्प महाराष्ट्र बाहेर महाराष्ट्र राज्यातील तरुणांचा विचार करायला सरकार तयार नाही
        महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाही इतर ठिकाणी उधळपट्टी करण्यासाठी पैसे आहेत मात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मात्र आता काही व्यक्ती आयत्या पिठावर रेगा ओढताना दिसून येत आहेत मला आपले आशीर्वाद हवे आहेत ते आपण द्यालच अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली,
Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

सातपूरला गॅसचा काळाबाजार उघडकीस

पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…

8 hours ago

गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाजारात उत्साह

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…

9 hours ago

कचरा करताना कुणीच कचरत नाही…

आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…

9 hours ago

शहरात 12 कोटींचा टीडीआर घोटाळा

स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…

9 hours ago

उन्हाच्या झळांनी धरणांच्या पाणीपातळीत घट

धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…

9 hours ago

चंदुकाका सराफ प्रस्तुत “विवाह तस्मै” कलेक्शन!

पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…

9 hours ago