रानभाज्यांनी आणली जेवणाला चव!

शहराच्या विविध भागात होतेय विक्री

नाशिक :अश्‍विनी पांडे
पावसाळ्याला सुरूवात झाली जिल्हयाच्या अदिवासी भागातून रानभाज्या विक्रीसाठी येत असतात. ग्राहकही वर्षभर फळ भाज्या अणि पालेभाज्या खाऊन कंटाळलेले असतात. त्यामुळे पावसाळ्यात रानभाज्या विक्रीसाठी आल्यानंतर नागरिकही रानभाज्या खरेदी करण्यासाठी गर्दी करत असतात. गोड, आंबट, तिखट अशा वेगवेगळ्या चवीच्या रानभाज्यांना वेगळ्या चवीच्या असतात. यांतील अनेक भाज्या जंगलात आणि विशेषता अभयारण्य परिसरात वावरणारे लोक वनौषधी म्हणून वापरत होते.
रानभाज्या या आरोग्यदायी असतात. सध्या काही भागात पावासामुळे शेतीचे नुकसान झाल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने भाजीपाला चांगलाच महागला आहे. 80 ते 100 रूपये किलो पर्यंत भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्यामुळे नागरिक 30 ते 40 रूपये किलोने विकल्या जाणार्या रानभाज्यांना अधिक पसंती देत आहे. आरोग्यदृष्ट्या शरीरासाठी पोषक असणार्या भाज्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. शहरात त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, सुरगाणा भागातून रानभाज्या विक्रीसाठी येतात. यात आकर्या, उळसा, करटूले, कोळू, कांचन, रानतेरा, आंबटवेल, दिंड, माठभाजी, करडू, आंबड अशा अनेक रानभाज्यांनी मागणी वाढली आहे. पावसाळ्यात रानभाज्या विक्रीसाठी असतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधीगुणधर्माची जाण असणारे ग्राहक आवर्जून रानभाज्या घेतात. रानभाज्यांना महत्त्व यावे आणि ग्राहकांना भाज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी रानभाज्या महोत्सव ही भरवण्यात येतात.
या सर्व भाज्या करण्यासाठी अगदी सोप्प्या आणि खायला रुचकर असतात. नैसर्गिक पद्धतीने उगवल्याने त्या आरोग्यासही चांगल्या असतात. त्यामुळे पावसाळ्या बरोबर येणारा हा रानमेवा अधिक लोकप्रिय होत आहेत.

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

विंचूरसह परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

अवैध व्यवसायांसह खून, लहान-मोठ्या चोर्‍यांची मालिका सुरूच विंचूर : संदीप शिरसाठ विंचूर ऐतिहासिक परंपरा लाभलेले…

9 hours ago

गोंदेश्वर मंदिराच्या दानकर्त्याचे शिल्प प्रकाशझोतात

प्रा. जावेद शेख यांचा संशोधनातून महत्त्वपूर्ण शोध सिन्नर : वार्ताहर ऐतिहासिक व स्थापत्यवैभवासाठी ओळखल्या जाणार्‍या…

9 hours ago

दारू दुकान हटविण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

अपघाती मृत्यूनंतर चांदवडमध्ये जनक्षोभ चांदवड : वार्ताहर येथील गणूर रोडवरील फुलेनगर भागात मंगळवारी (दि. 24)…

10 hours ago

मनमाडमध्ये स्वच्छतेचा केवळ देखावा; राष्ट्रवादीची टीका

मनमाड : अमिन शेख मनमाड नगरपालिकेचे नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून सध्या शहरात राबविली जाणारी स्वच्छता…

10 hours ago

मनपा हद्दीत 16 ग्रामपंचायतींच्या कचर्‍याचा बोजा?

व्यवस्था कोलमडणार; महासभेवर लवकरच प्रस्ताव? नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेला आपल्याच कचर्‍याचे वर्गीकरण करण्यात अपयश…

10 hours ago

लक्ष्मी वेंकटेश मंदिर सायखेडा येथे ब्रह्मोत्सवात रंग-भक्तीचा संगम

पालखी सोहळ्याने सायखेडा भक्तिमय नाशिक : प्रतिनिधी सायखेडा येथे बालाजी भगवान संस्था यांच्या प्राचीन परंपरेनुसार…

10 hours ago