नाशिक : प्रतिनिधी
नागरिकांना आर्थिक व्यवहार करणे सोपे जावे यासाठी एटीएमची निर्मिती करण्यात आली. एटीएमच्या निर्मितीमुळे बँकेत जात तासनतास उभे राहण्याच्या त्रासापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नागरिकही एटीएमचा वापर करत असतात. मात्र बँकांनी खर्च कमी करण्यासाठी एटीएम बाहेरील सुरक्षा रक्षक हटवून फक्त सीसीटिव्हीवरच भरवसा ठेवला आहे. परिणामी चोरट्यांकडून एटीएम लक्ष्य केले जात आहे.
शहरातील सातपूर परिसरात दोन दिवसापूर्वी दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र यामुळे एक प्रश्नही निर्माण झाला आहे की शहरातील एटीएमच्या सुरक्षेच्याबाबतीत दुर्लक्ष होत आहे का? शहरात वारंवार घरफोडीच्या घटना घडत असताना चोरट्यांची मजल आता एटीएम फोडण्यापर्यंत गेली आहे. शहरातील सातपूर परिसरात चोरट्यांने दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. नागरिक एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जात असतात अशा वेळी चोरट्यांनी नागरिकांवर हल्ला करण्याचीही भीती वर्तविण्यात येत आहे. शहरातील अनेक एटीएमवर सुरक्षा रक्षक नसल्याचे चित्र आहेत. त्यामुळे नागरिकांना एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी जाण्याची भीती वाटत आहेत.
राज्यभरात शिक्षकांचे आंदोलन; अधिवेशनात धरणे आंदोलनाचा इशारा पुणे : टीईटी परीक्षेच्या विरोधात शुक्रवारी (दि. 5)…
नाशिक गारठले : गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात घट होत असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोटीचा…
चार महिन्यांत सातशे कोटी वसुलीचे मनपाला आव्हान नाशिक : प्रतिनिधी शहरातील करदात्यांकडील थकबाकीचा आकडा तब्बल…
भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न; प्रतीकात्मक करवत, कुर्हाड जाळून निषेध नाशिक : प्रतिनिधी तपोवनातील वृक्षतोडीवरून महायुतीतच…
घोटी-त्र्यंबकेश्वर वाढीव रस्त्याचा प्रश्न; पोलिसांनी शेतकर्यांना घेतले ताब्यात घोटी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यातील घोटी- त्र्यंबकेश्वर…
मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. जो कधी चुकतच नाही तो माणूसच नाही, असे म्हटले तर…