महाराष्ट्र

लोणची बनवताना ही काळजी घ्यावी

लोणच्याची सर्व जिन्नस कैरी, लिंबू, इतर भाज्या ताज्या व करकरीत असाव्यात. स्वच्छ धुवून कोरड्या कराव्या.
मीठ, तिखट मंद आचेवर वेगवेगळे भाजून, गार करून लोणच्यात घालावे.
तेलाची फोडणी पूर्ण गार करावी.
खडा हिंग कुटून तळून वापरावा. स्वाद छान लागतो.
मेथी, मोहरी डाळ ताजी वापरावी, जुनी घेऊ नये,
बरणीला हिंगाची धुरी द्यावी, हिंग पेटून बरणी पालथी घालावी, धूर कोंडला जातो.
चिनी मातीच्या बरणीत लोणचे जास्त टिकते, कारण बाहेरील वातावरणाचा बरणीवर फारसा परिणाम होत नाही.
लोणचे एकाच मोठ्या बरणीत न भरता दोन-तीन मध्यम बरणीत भरावे, एक, दोन, तीन असे स्टिकर्स लावावे, चुकून बरणी फुटली, तडा गेला तर पूर्ण वर्षाचे लोणचे वाया जात नाही.
लोणचे काढल्यावर तेल कमी वाटले तर तेल घेऊन तापवावे, गार झाल्यावर परत लोणच्यात घालावे, तेलाची पातळी योग्य असावी म्हणजे तेल थोडे जास्त झाले तर चालेल, पण कमी नको.
लोणचे शक्यतो सकाळी घालावे.
मेथी जास्त झाली तर लोणचे चिकट होते. मोहरी जास्त झाली तर कडवट होते आणि हिंग जास्त झाला तर तिखट व उग्र होते.
लोणची मधून मधून ढवळून तेलाचा थर व मीठ पहावे.
लोणच्याला दादरा बांधल्यावर नाडीऐवजी इलेस्टिक वापरावे.
काही गृहिणी मसाल्यात एक टेबलं स्पून साखर घालतात, त्यामुळे लोणचे आंबट होत नाही.
– मीनल

Bhagwat Udavant

Recent Posts

कोकाटे यांचे मंत्रिपद वाचले पण खाते बदलले, आता हे खाते

मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…

7 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात

मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…

16 hours ago

मालेगाव बॉम्बस्फोट खटला: सर्व आरोपी निर्दोष

नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…

19 hours ago

जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल जालन्याच्या जिल्हाधिकारी,

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…

1 day ago

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती!

भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर  : साजिद…

2 days ago

विवाह हा संस्कार

भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…

2 days ago