बोरगावजवळ तीन शेतकरी ठार
नाशिक : प्रतिनिधी
भाजीपाला घेऊन जाणारी पिकअप आणि खासगी आराम बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन शेतकरी ठार झाल्याची घटना काल बोरगावजवळ घडली. बोरगावहून एमएच 41 ए.यू2192 ही पिकअप भाजीपाला भरुन नाशिक बाजार समितीत जात असताना चिखली गावाजवळ खासगी आराम बस आरजे27पीबी2658 यांच्यात धडक झाली. यात तीन शेतकर्यांचा जागीच मृत्यू झाला.
कैलास पंडीत दळवी (25, तताणी) पंढरीनाथ मुरलीधर भोये (55,शृंगारवाडी) नारायण पवार55, घागरबुडा, ता. सुरगाणा अशी अपघातात ठार झालेल्या शेतकर्यांची नावे आहेत. अपघातानंतर नातेवाइक आणि ग्रामस्थांनी गर्दी केली. लक्झरी बसचा चालकाला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी महामार्ग रोखला. त्यामुळे गर्दी झाली होती.
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…