नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे लाही लाही होत असताना आता दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे . भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार , यावर्षी नैऋत्य मान्सून देशात वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो . अंदमान आणि निकोबार बेटांवर १५ मे रोजी पहिला हंगामी पाऊस पडण्याची शक्यता आहे . भारतीय हवामान विभागाच्या मते , नैऋत्य मान्सून १५ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे . हवामान शास्त्रज्ञांच्या मते , पूर्व मान्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून , मान्सून आधी केरळ आणि नंतर उत्तरेकडे सरकेल . केरळमध्ये मान्सून साधारणपणे १ जून रोजी दाखल होतो . परंतु , यंदा वेळेआधी म्हणजे २७ मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे . पोषक वातावरण राहिल्यास पुढच्या सात दिवसांत मान्सून महाराष्ट्रात येऊन धडकणार आहे . अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल , असा हवामान खात्याचा अंदाज आहे . १४ ते १६ मेदरम्यान द्वीपसमूहात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे . आज मान्सून अंदमानात दाखल १५ आणि १६ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रावर ४० ते ६० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याची शक्यता आहे . दरम्यान , काही राज्यांमध्ये पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे .
देशात ७० टक्के पाऊस
साधारणपणे मान्सूनची सुरुवात केरळपासून होते आणि नंतर तो हळूहळू देशभर पसरतो . त्यामुळे देशातील एकूण पावसापैकी ७० टक्के पाऊस नैऋत्य मान्सूनमधून पडतो . भारतातील निम्मी रब्बी पिके या मान्सूनवर अवलंबून आहेत .
सिडको विशेष प्रतिनिधी : -पाथर्डी पंचक्रोशीतील पिंपळगाव खांब येथील माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या शेतात…
प्रधान सचिवांची ऑनलाइन आढावा बैठकीत सूचना नाशिक : प्रतिनिधी शहरात पन्नास लाखांची वनसंपदा असल्याचे सहा…
भरारी पथकांकडून शहरात धडक मोहीम नाशिक : प्रतिनिधी शहरातील गंगापूर रोडवरील पंड्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदानाचा…
वर्षभरात 55 हजार किमी रस्ते सफाईचा दावा; आता चार महिने बंद नाशिक ः प्रतिनिधी गुजरातमधील…
प्रत्येक मुलीचे जीवनातील महत्त्वाचा क्षण म्हणजे, ज्यावेळी ती सासरी जाते. ज्या घरात ती वावरली, हसली,…
राग ही माणसाच्या मनाची एक सहज आणि स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. प्रत्येकालाच राग येतो. कारण सगळं…