दर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी आवारातच फेकले टोमॅटो

लासलगाव:समीर पठाण
गेल्या एक महिन्यापूर्वी दीडशे ते दोनशे रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या बाजारभावाची लाली उतरली असल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीच्या आवारातच टोमॅटो फेकून देत आपला संताप व्यक्त केला.सद्या टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेट्सला पन्नास ते शंभर रुपयापर्यंत दर मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रंचड रोष निर्माण झाला आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने टँकरच्या साह्याने शेतकऱ्यांनी टोमॅटोला पाणी दिले,आजच्या दरामध्ये उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक आणि मजुरी खर्चही निघणे मुश्किल झाले आहे.विविध संकटांचा सामना करत मेहनतीने पिकवलेल्या टोमॅटोला अवघा चार ते पाच रुपये किलो तर प्रति क्रेट ५० ते १०० रुपये दर मिळत असल्याने यातून उत्पादन व वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने टोमॅटो विक्रीसाठी आणूनही उत्पादन खर्च निघत नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो बाजार समिती आवारात फेकुन देत निषेध व्यक्त केला.
गेल्या एक ते दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने तसेच वातावरणातील होत असलेल्या बदलामुळे औषधाचा वाढणारा खर्च तसेच टोमॅटो पिकवण्यासाठी लागणारी मजुरी,वाहतुकीचा खर्च हे सर्व करूनही टोमॅटोला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने बळीराजा हताश झाला आहे.मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.मागील महिन्यात याच टोमॅटो ला उच्चांकी दर मिळाल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक वाढली.
Bhagwat Udavant

Recent Posts

पदाचा गैरवापर; तत्कालीन प्रांताधिकारी निलंबित

मालेगावला संगमेश्वरमधील जमीन चुकीच्या पद्धतीने केली वर्ग एक मालेगाव : नीलेश शिंपी शहरातील संगमेश्वर येथील…

15 minutes ago

सर्व संतांच्या दिंड्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या वेशीवर

वाखारीत आज रिंगण सोहळा; वर्षानंतर संतांची गळाभेट, त्यानंतर नगर प्रवेश त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी आषाढवारीसाठी निघालेली…

18 minutes ago

ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची…

24 minutes ago

मनमाड शहरात वाहतूक कोंडी; गाडी बंद, रस्ता बंद

वाहनचालकांसह नागरिक त्रस्त; खासदारसाहेब, आम्हाला या जाचातून मुक्त करा! मनमाड : प्रतिनिधी दुष्काळी अन् पाणीटंचाई…

31 minutes ago

वीज वितरणकडून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लूट

दहमहा वीजबिलात दुप्पट, तिप्पट वाढ; ग्राहकांमध्ये संतापाची भावना निफाड : तालुका प्रतिनिधी वीज वितरण कंपनीकडून…

36 minutes ago

वारी…ज्ञानराज माउलींचे वरदान!

लोकीचे वैकुंठ पंढरपूर येथे होणारा आषाढीवारीचा महामेळा महाराष्ट्राचे आध्यात्मिक व सांस्कृतिक संचित आहे. 12 व्या…

48 minutes ago