रेल्वेगाड्या रद्द

 

नाशिकरोड : प्रतिनिधी केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेविरोधात देशात काही ठिकाणी युवकांकडून विरोध होत आहे . रेल रोको केला जात आहे . त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही रेल्वे वेळापत्रकावर परिणाम झाला . काही गाड्या रद्द करण्यात आल्या . तर काही विलंबाने धावत असल्याचे रेल्वेने सांगितले . बिहारवरून येणारी पाटलीपुत्र , पटणा वास्को , पवन या तीन गाड्या रविवारी रद्द करण्यात आल्या . मुंबईहून बिहारला जाणारी भागलपूर , पवन , जनता एक्स्प्रेस , स्पेशल हॉलिडे या रद्द करण्यात आल्या . बिहारवरून येणारी महानगरी एक्स्प्रेस चार तास , गोदान तीन तास उशिराने धावली . काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले . नाशिक रोडमार्गे मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून उत्तर भारतात सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांना आंदोलनाचा फटक प्रामुख्याने बसत आहे . बिहारमधील पाटलीपुत्र भागलपूर येथून मुंबईला रवाना होणाऱ्या प्रवासी रेल्वेगाड्या उत्तर भारतातील आंदोलनामुळे काल रद्द करण्यात आल्या होत्या . अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन असेच सुरू राहिले तर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडू शकते . गैरसमजातून सुरू झालेले हे आंदोलन आणखीन किती काळ सुरू राहणार हे स्पष्ट होत नसल्यामुळे रेल्वे वेळापत्रकाबाबतही अनिश्चितता आहे . आणि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *