नाशिक

तर वीस कोटी निधी केंद्राकडे जाणार

 

 

 

केंद्राचा पालिकेला ३१ मार्चचा अल्टीमेटम ?

 

 

नाशिक :  प्रतिनिधी

 

 

केंद्र सरकारच्या पर्यावरणपूरक धोरणाअंतर्गत पालिकेला मिळालेला निधी पुन्हा जाण्याची शक्यता आहे. केंद्राने

 

मागील वर्षी मिळालेला अखर्चीत वीस कोटीचा निधी ३१ मार्च पर्यंत खर्च करण्याचा अल्टीमेटम दिल्याचे समजते.

 

केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने २०२४ पर्यंत देशभरातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी तीस टक्क्यांनी कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात एन-कॅप योजना सुरू केली. आहे. या योजनेत नाशिकचाही समावेश करण्यात आला अाहे. महापालिकेला दोन टप्प्यात वीस कोटी तर चालू आर्थिक वर्षात सहा असा एकूण ४६ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. दरम्यान केंद्राकडून त्यामुळे पालिकेची धावपळ अन्यथा हा निधी पुन्हा केंद्राकडे जाण्याची भीती आहे.

 

केंद्र सरकारच्या पर्यावरणपूरक धोरणाअंतर्गत

 

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका पन्नास इलेक्ट्रिक बसच्या खरेदीसाठी उत्सुक होती. पण केंद्राला स्मरणपत्रे पाठवुनही त्याबाबत अद्याप प्रतिसाद लाभला नाही. त्यानंतर या योजनेअंतर्गत विद्युत शवदाहिनी, यांत्रिकी झाडू खरेदीचा प्रस्ताव तयार केला. शहरातील अमरधाममध्ये चार ठिकाणी विद्युत दाहिनी बसवण्याचे काम सुरु आहे. तसेच दहा कोटी रुपये खर्च करुन यांत्रिकी झाडूचा प्रस्ताव तयार केला. मात्र, शासनाकडे त्याची स्कुटिनी सुरु असून अद्याप खरेदीला ग्रीन सिग्नल मिळाला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित आहे. हा निधी खर्च करण्यासाठी केंद्राने ३१ मार्चची डेडलाईन दिली आहे. त्यामुळे महापालिकेने हा निधी परत जाऊ नये यासाठी इ चार्जिंग स्टेशनचे कामाला गती दिली आहे. एन कॅप योजनेअंतर्गत नवीन आर्थिक वर्षात निधी हवा असेल तर कमीतकमी वीस कोटी निधी खर्च करावा लागणार आहे. महापालिकेला मागील तीन वर्षात ४६ कोटींचा निधी प्राप्त झाला असला तरी तो, मोठ्या प्रमाणात अखर्चित आहे. त्यापैकी वीस कोटी निधी येत्या ३१ मार्चपर्यंत खर्च करावा अन्यथा तो शासनकडे परत जाईल असा अल्टिमेटम महापालिकेला देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे विद्युत दाहिनी, यांत्रिकि झाडू खरेदी,  ई – चार्जिंग स्टेशन उभारणे आदी काम मार्गी लावण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरु झाली असून कामाची गती वाढल्याचे पहायला मिळते

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago