नाशिक

दिल्लीत जाऊन वाणिज्य मंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा

लासलगावला राज्य कांदा उत्पादक संघटनेची बैठक

लासलगाव:समीर पठाण

 

कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे,नाफेड व एनसीसीएफचा कांदा बंद करणे आणि नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनकडून जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवले आहे याबाबत पुढील रणनीती ठरविण्यासाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांची बैठक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या उपस्थितीत लासलगाव बाजार समितीत आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला नाशिक,पुणे,नगर,धुळे,संभाजीनगर यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.या वेळी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला

 

गेल्या पाच दिवसांपासून कांदा व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील बाजारसमित्या बंद ठेवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी केली आहे.या बाजार समित्या ज्या बंद आहे त्याला सर्वस्वी केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी या वेळी केला.या बैठकीत केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेले ४० टक्के निर्यात शुल्क तातडीने रद्द करून बाजार समित्या सुरू कराव्या,नाफेड व एनसीसीएफचा कांदा बाजारात उतरवू नये,राज्य सरकारने कांदा उत्पादकांना ३५० रु जे अनुदान दिले आहे त्यातील फक्त दहा हजार रुपयेच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे तर काही शेतकऱ्यांना ते देखील अजून मिळालेले नाही.या अनुदानाची सर्व रक्कम जी शासनाकडे जमा आहे ती रक्कम या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर एकरकमी जमा करावी अश्या विविध मागण्या या बैठकीत करण्यात आल्या.तसेच केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले निर्यात शुल्क तातडीने रद्द करण्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधींनी जोरदार प्रयत्न करावा अन्यथा संघटनेच्या वतीने दिल्लीत जाऊन केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना घेराव घातला जाईल असा इशारा भारत दिघोळे यांनी या वेळी दिला.

 

या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे,जयदीप भदाने,केदारनाथ नवले,विलास रौंदळ,संजय भदाने,राहुल कान्होरे,सोमनाथ मगर,भगवान जाधव,सुभाष शिंदे,हर्षल अहिरे,किरण सोनवणे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashvini Pande

Recent Posts

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

46 seconds ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

13 minutes ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

18 minutes ago

सलग दुसर्‍या दिवशीही मुसळधार

तासाभरात 17 मिलिमीटर पावसाची नोंद नाशिक ः प्रतिनिधी आठवडाभर पावसाने उसंत घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून…

27 minutes ago

लिंकिंगला नाही म्हणा, कृषी निविष्ठा दुकानांमध्ये लागले फलक

कृषिमंत्र्यांच्या निर्णयाने शेतकर्‍यांना दिलासा, आर्थिक भुर्दंड टळणार सिन्नर : प्रतिनिधी युरिया आणि डीएपी सारख्या खतांबरोबर…

49 minutes ago

मिलरला अडकून दुचाकीस्वार ठार

मुकणे : प्रतिनिधी नाशिक-मुंबई महामार्गाचे सहापदरीकरण करणार्‍या पाडळी देशमुखजवळील सीडीएस कंपनीबाहेर रस्त्यावर सिमेंट मिक्सिंग करणार्‍या…

56 minutes ago