नाशिक:प्रतिनिधी
जाखोरी गावाजवळील चांदगिरी येथे घरासमोर असलेल्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका आठ वर्षाच्या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कार्तिक शिवाजी शेलार (वय ८) चांदगिरी हा मुलगा घराजवळ असताना जवळच असलेल्या कडवा कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेला होता. परंतु, पाणी जास्त असल्याने सदर बालकाला अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.दरम्यान, गावकरी ना समजताच त्यांनी तातडीने त्याला बाहेर काढले व उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. या घटनेप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…