नाशिक

शहरावर पाणी टंचाईचे संकट

गंगापूर धरणात केवळ 27 टक्के पाणीसाठा
नाशिक : प्रतिनिधी
पावसाने ओढ दिल्याने शहरात पाणी कपातीचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापुर धरणात केवळ 27 टक्केच पाणी साठा शिल्लक राहिला आहे. संपूर्ण जून महिना संपला तरी शहरात समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी कपातीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात जर समाधानकारक पाऊस नाही झाला तर नाशिककरांना पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात जिल्हयाच्या काही भागात पाऊस झाला पण त्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. धरणाच्या पाणी साठयात वाढ होण्यासाठी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडणे गरजेचे आहे. गंगापूर धरणासह जिल्हयातील इतर धरणाचा पाणीसाठीही कमी झाला आहे. जुलै महिन्यात तरी समाधानकारक पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पावसाला विलंब होत असल्याने धरणातील पाणी साठ्यात घट होत आहे.

पेरणी लांबणीवर
पावसाने पाठ फिरवल्याने पेरणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त्र झाले आहे. जुलै महिन्यात तरी चांगला पाऊस पडेल याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.

पाणी कपातीचे संकट
शहरातला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात अवघा 27 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने येत्या आठवड्याभरात चांगला पाऊस झाला नाही तर पाणी कपातीच्या संकटाचा सामना नाशिककरांना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जिल्हयातील धरण      उपलब्ध पाणीसाठा ( टक्केवारी)
गंगापूर धरण समुह
गंगापूर धरण –              27 %
कश्यपी –                    16 %
गौतमी गोदावरी –           24 %
आळंदी प्रकल्प –            02 %
पालखेड धरण समुह
पालखेड                       43 %
करंजगवण                    11 %
वाघाड-                        05 %
ओझरखेड –                  26 %
पुणेगाव-                      11 %
तिसगाव-                   शुन्य टक्के
दारणा –                       14 %
भावली-                       08%
मुकणे –                       30%
वालदेवी-                      10%
कडवा –                        13 %
नांदुर मधमेश्‍वर-              82 %
भोजापूर-                      06 %
गिरणा खोरे धरण समुह
चणकापुर –                    20 %
हरणबारी-                      27 %
केळझर-                       06 %
नागासाक्या-                शुन्य टक्के
गिरणा धरण –                 33 %
पुनद –                           21%
माणिकपुंज-                  शुन्य टक्के

हेही वाचा: पाणी काटकसरीने वापरण्याचे, नारायणबापू सोसायटीचे आवाहन

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

18 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

20 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

20 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago