नाशिक

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता संकेत देणार नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो, असे थेट वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. आपल्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताच संभ्रम नाही, असेही ते म्हणाले. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरेंच्या युतीवर दोन्ही नेते सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात दोन्ही ठाकरे बंधूंंमधील मनोमिलनाची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे.परंतु अद्याप तसा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही. युतीची चर्चा ही कॅमेर्‍यासमोर होत नाही, असे मनसेच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते.तसेच या आधी 2014 आणि 2017 साली अशीच चर्चा झाली होती, त्यामुळे आता ताकही फुंकून प्यावं लागत असल्याचे मनसेनेच्या नेत्यांनी म्हटले होते. मनसेच्या या प्रतिक्रियावर उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होणारच असे उद्धव ठाकरे म्हणाले. युतीच्या चर्चांवर आता कोणतेही संकेत देणार नाही, थेट बातमीच देतो असेही ते म्हणाले. युतीसंबंधी जे बारकावे असतील त्यावर आम्ही काय करायचे ते पाहू असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरेंचे हे वक्तव्य म्हणजे शिवसेना-मनसे युतीकडे पडलेले पुढचे पाऊल असल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरेंच्या बातमीची वाट पाहू!

मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, ज्यावेळी आमच्याकडे युतीचा ठोस प्रस्ताव येईल त्यावेळी त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील. उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही आहे ते होईल. परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात 2014 आणि 2017 सालीही काहीतरी होते. पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हते. त्यामुळे जनतेच्या मनात काहीही असो, उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे ते महत्त्वाचे. उद्धव ठाकरे म्हणाले की, ते बातमी देणार. त्यामुळे ते काय बातमी देणार याची वाट पाहू, असे देशपांडे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनाच विचारले पाहिजे : मुख्यमंत्री

गडचिरोली येथील कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी मनोमिलनाबाबत विचारले असता त्यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची प्रतिक्रिया माझ्याऐवजी राज, उद्धव ठाकरे यांनाच विचारले तर बरे होईल, असे सांगत विषयाला बगल दिली.

शिंदेंनी जोडले हात

पुण्याच्या दौर्‍यावर असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाबाबत पत्रकारांनी विचारले असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता हात जोडले.

 

Gavkari Admin

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

7 hours ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

7 hours ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

7 hours ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

7 hours ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

8 hours ago

सलग दुसर्‍या दिवशीही मुसळधार

तासाभरात 17 मिलिमीटर पावसाची नोंद नाशिक ः प्रतिनिधी आठवडाभर पावसाने उसंत घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून…

8 hours ago