नाशिक

जि.प. , पंचायत समित्यांची आरक्षण सोडत स्थगित

मुंबई : परिषदेच्या राज्यातील २५ जिल्हा निवडणुका ढे जाण्याची शक्यता आहे . कारण , २५ जिल्हा परिषदा आणि १८४ पंचायत समित्यांमध्ये निवडणूक आयोगाकडून तूर्तास आरक्षण कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे . सुप्रीम कोर्टात १ ९ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे , असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले . निवडणूक आयोगाकडून याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे . सुवाणीनंतर राज्य निवडणूक आयोगाकडून परिपत्रक काढण्यात आले . मुंबई , मुंबई उपनगर , पालघर , ठाणे , धुळे , नंदुरबार , अकोला , वाशिम , भंडारा आणि गोंदिया जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक नागपूर , आयोगाने परिपत्रक पाठवले आहे . ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात काल झालेल्या व त्याअंतर्गतच्या राज्यातील २५ जिल्हा परिषदा,
२८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे . राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता ; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात आज सुनावणी झाली . काय म्हटलेय परिपत्रकात ? राज्य निवडणूक आयोगाचे दिनांक ५/७/२०२२ रोजीच्या पत्रान्वये २५ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १८४ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका २०२२ करिता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम देण्यात आला आहे . परंतु सर्वो च्च न्यायालयातील दाखल विशेष अनुमती याचिका क्रम १ ९ ७५६ / २०२१ मध्ये राज्य शासनाने दाखल केलेल्या अर्दाजवर आज सुनावणी झाली असून एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे . त्यामुळे आयागोनं पाच जुलै रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आला आहे . यासंदर्भात सुधारीत आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल . ९ २ नगरपरिषदांच्या जाहीर निवडणुकांसाठी लागू होणार की नाही ? सुप्रीम कोर्टानं हा आदेश दिल्यानंतर तो ९ २ नगरपरिषदांच्या जाहीर निवडणुकांसाठी लागू होणार की नाही याबाबत संभ्रम होता . कारण या निवडणुकांचं नोटफिकेशन २० जुलैला निघणार आहे . सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचे वकील , सॉलिसिटर जनरल यांनीही या संभ्रमावर काही काळ चर्चा केली . त्यानंतर हे स्पष्ट झालं की आजचा आदेश या ९ २ नगरपरिषदांसाठी लागू नसेल . १ ९ जुलैला काय होतं यावरच ९ २ नगरपरिषदांमधल्या ओबीसी आरक्षणाचं भवितव्य ठरेल . त्यावरच राज्यात मुंबई , पुणे , नागपूरसह २० महानगरपालिका , २५ जिल्हा परिषदांमधल्या ओबीसी आरक्षणाचंही भवितव्य अवलंबून असेल . आज काय म्हणालं सुप्रीम कोर्ट ? ज्या ठिकाणी निवडणूक अधिसूचना निघालेली आहे त्यात आता हस्तक्षेप होणार नाही . पण ज्या ठिकाणी अधिसूचना निघालेली नाही , तिथे मात्र तूर्तास कुठली नवी अधिसूचना नको . मंगळवारी १ ९ जुलैला आम्ही या सगळ्याबाबत पुढची सुनावणी करु असं कोर्टानं म्हटलं आहे .

Ashvini Pande

Recent Posts

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला गती

मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्‍यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…

21 minutes ago

जातो माघारी पंढरीनाथा…

महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…

25 minutes ago

जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोर‘धार’; धरणांतून विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…

30 minutes ago

सरदवाडी धरण ओव्हरफ्लो; भोजापूरच्या पूरचार्‍यांना सोडले पाणी

आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…

35 minutes ago

किचन ट्रॉलीच्या कंपनीला भीषण आग

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…

39 minutes ago

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…

1 hour ago