देशात लॉकडाउनच्या चर्चा पूर्णपणे ‘निराधार’

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा लॉकडाउन लागू होणार असल्याच्या सोशल मीडियावर पसरणार्‍या चर्चा पूर्णपणे चुकीच्या आणि निराधार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. विविध केंद्रीय मंत्र्यांनी शुक्रवारी अधिकृत निवेदनांद्वारे या अफवांचे जोरदार खंडन केले असून, जनतेने अशा कोणत्याही दिशाभूल करणार्‍या दाव्यांवर विश्वास ठेवू नये, असे कळकळीचे आवाहन केले आहे.
सध्याच्या जागतिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात निर्बंध लादले जाणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांतून आणि समाजमाध्यमांवर फिरत होत्या. मात्र, गृहमंत्रालय आणि संबंधित विभागांनी स्पष्ट केले आहे की, सरकारचा असा कोणताही विचार नाही. अर्थव्यवस्थेला बाधा पोहोचेल किंवा जनजीवन विस्कळीत होईल, असा कोणताही निर्णय केंद्र स्तरावर प्रलंबित नसल्याचे मंत्र्यांनी नमूद केले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी नागरिकांना विनंती केली आहे की, सोशल मीडियावर येणार्‍या अनधिकृत आणि संशयास्पद संदेशांना घाबरून जाऊ नका किंवा ते पुढे पाठवू नका. कोणत्याही महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयाची माहिती केवळ अधिकृत सरकारी वाहिन्या आणि ’पत्र सूचना कार्यालय’ यांच्या माध्यमातूनच दिली जाते. अफवा पसरवून समाजात भीती निर्माण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत.सद्यस्थितीत देशातील सर्व अत्यावश्यक सेवा, वाहतूक, बाजारपेठा आणि उद्योग नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहतील. नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार करताना कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जनतेच्या हितालाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे.

Talks of lockdown in the country are completely ‘baseless’

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *