बांधावरली न्याहारी…

शेताच्या बांधावर बसून खाल्लेल्या चार घास न्याहारीची चव काही औरच लागते ना! आपल्या बळीराजाला तर घरातल्यापेक्षा त्याच्या शेतात बांधावर बसून न्याहारी करायला खूप आवडतं. घरातून निघताना तो चार-दोन घास अगदी घाईत खातो. आणि शेतात गेल्यावर मात्र मोकळ्या आभाळाखाली, शेतातल्या काळ्या मातीवर मांडी घालून बसून अन् तिच्या सान्निध्यात तिनेच आपल्याला दिलेली भाकर खात जणू तिचे आभार मानत बहरलेल्या त्या हिरव्यागार शेताकडे न्याहाळत असतो. आणि त्या आभाळाचेही आभार मानत असतो. यात कृतार्थ भावही दिसून येतो. कारण ते आभाळ वेळोवेळी बरसत असते वेळेवर म्हणूनच दोन वेळचे आपल्याला पोटभर मिळतं याची त्याला जाणीव असते. तेव्हा नक्कीच मात्र चार घास त्याच्या उदरात जास्तच जातात अन् तृप्तीचा ढेकरही येतो.
त्यातला म्हणजे त्याच्या न्याहारीतला काही वाटा हा त्याच्या लाडक्या मोती कुत्र्याचा तर हमखास असतोच. पण काही त्या पाखरांचाही असतो. तो जेवायला बसला की झाडावरची चिवचिव, कावकावही वाढते. एवढंच काय तर तो जेवायला बसला की अगदी त्या इवल्या मुंग्यासुद्धा जवळ येतात हो! त्याच्या न्याहारीतला त्यांचाही वाटा घ्यायला. जणू सारेजण त्याची वाटच पाहत असतात. आणि म्हणूनच की काय त्याला घरात न्याहारी मात्र काही गोड लागत नाही आणि मग तो शेतावरती जाताना ती सोबत बांधून नेतो आणि तिकडे गेल्यावर मात्र आनंदाने त्या सार्‍यांसोबत पोटभर खातो. कधी घाईघाईत निघाला किंवा विसरला तर त्याची सहचारिणी पाठीमागून डोक्यावर पाटीमध्ये न्याहारीची भाकरी बांधून घेऊन जातेच.
हा सारा अनुभव मलाही लहानपणी मामाच्या घरी गेल्यावर यायचा. शेताच्या अगदी जवळच म्हणजे अगदीच हाकेच्या अंतरावर घर असूनही मामा आरोळी देऊन भाकरी मात्र शेतातच मागवायचा. बैलजोडी सावलीला बांधून आणि बांधावर बसून जेवायचा. शिवारानं दिलेलं शिवाराच्याच हव्याहव्याशा अशा सान्निध्यात मोकळ्या आभाळाखाली बसून खायचं. त्याची न्याहारी होईपर्यंत बैलांचाही चारा खाऊन व्हायचा. खरंच खूप छान अनुभव असतो.
खरंच बळीराजाचे ऋणानुबंध खूप घट्ट असतात. ती काळी माती, ते हिरवं शिवार, ते आभाळ अन् निसर्गाशी निगडित त्या हरेक घटकाशी. भलेही मग त्यात नसतील गोडधोड पक्वान्नं, भलेही एकच भाजीभाकर असेल पण सोबत जर झणझणीत चटणी, कांदा आणि ताकाचा काठोकाठ भरलेला तांब्या असला की मग बस्स! त्याला मात्र तुमचं बाकी दुसरं काहीही नको असतं. खरंच महागड्या, आलिशान हॉटेलातल्या त्या सजवलेल्या टेबल-खुर्चीवर बसून आणि पंचपक्वान्नाने भरून खाल्लेल्या ताटालाही मागे टाकते ही बांधावर मांडी घालून बसून खाल्लेली न्याहारी आणि हे सारं मात्र ती स्वतः खाऊन अनुभवल्याशिवाय काही कुणाला कळणारच नाही…

वंदना गांगुर्डे

Ashvini Pande

Recent Posts

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला गती

मालेगाव, नांदगाव तालुक्यांतील 21 गावांतील शेतकर्‍यांना नोटिसा मालेगाव : नीलेश शिंपी गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत…

14 hours ago

जातो माघारी पंढरीनाथा…

महाराष्ट्रातूनच नाही, तर जगभरातून साधारण महिन्यापासून विठुरायाचा वारकरी आषाढी वारीच्या निमित्ताने पायी वारीत निघाला होता.…

14 hours ago

जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी जोर‘धार’; धरणांतून विसर्ग

नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यात सुरू असणार्‍या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर आला आहे. जूनमध्ये…

14 hours ago

सरदवाडी धरण ओव्हरफ्लो; भोजापूरच्या पूरचार्‍यांना सोडले पाणी

आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू सिन्नर : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या…

15 hours ago

किचन ट्रॉलीच्या कंपनीला भीषण आग

सिडको : विशेष प्रतिनिधी अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर…

15 hours ago

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन

शिक्षक नेते के. के. अहिरे यांचे निधन नाशिक: प्रतिनिधी जेष्ठ शिक्षक नेते, लखमापूरच्या कादवा स्कुल…

15 hours ago