विचित्र अपघात! ट्रकमध्ये उतरला वीजप्रवाह नंतर फुटले टायर; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

ट्रकचालकासह हमालाचा दुर्दैवी मृत्यू

दिक्षी: प्रतिनिधी

शेणखताची वाहतूक करणाऱ्या मालट्रकच्या पाठीमागील बॉडीला वीजप्रवाह सुरू असलेल्या तारेचा धक्का लागल्याने चालकासह हमालाचा मृत्यू झाल्याची घटना निफाड तालुक्यातील दावचवाडी येथे गुरुवारी (दि. १६) सकाळी घडली. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे…पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील दावचवाडी येथे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास मुंबई येथील पारसनाथ गणपत पाल मालट्रकमधून (क्र.एमएच १५ बीजे ७४८३) शेणखत घेवून पिंपळगाव बसवंतमार्गे दावचवाडी गावात आले.

तेथून शेणखत खाली करणारे हमाल पप्पू सोमनाथ यादव व विजय प्रल्हाद शिंदे यांना गाडीमध्ये बसवून पालखेड शिवारातील शेतकरी बाळासाहेब नाना आहेर यांच्या शेतात दावचवाडी – पालखेड शिव रस्त्याने जात होते.याठिकाणी लोंबकळलेल्या वीजवाहक तारेचा ट्रकला धक्का लागला. त्यामुळे ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरला. त्यानंतर क्लिनर बाजूचे पाठीमागील टायर फुटले आणि चालक व हमाल बाहेर फेकले गेले. यात चालक आणि हमाल या दोघांचा मृत्यू झाला आहे.तर हमाल पप्पू सोमनाथ यादव याने गाडीतून उडी मारली. तोपर्यंत वीजप्रवाह बंद झाल्याने तो वाचला. मृतांमध्ये ट्रकमालक पारसनाथ गणपत पाल (वय ६३, रा. घर नं. ६३०, शिवशक्ती नगर, ठाणे, बेलापूर रोड, तुर्भे स्टोर, नवी मुंबई, तुर्भे, ठाणे) व हमाल विजय प्रल्हाद शिंदे (वय ३९, मुळ रा. सोनुन, ता. चोंढी, जि. अकोला, ह. मु. दावचवाडी, ता. निफाड, जि. नाशिक) या दोघांचा समावेश आहे.इलेट्रीक शॉक लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे तपास करत आहे

Bhagwat Udavant

Recent Posts

नाशिकच्या द्राक्षांची यंदाही आंतरराष्ट्रीय छाप

जिल्ह्यातून 1.57 लाख टन द्राक्षांची युरोपसह अन्य देशांत निर्यात लासलगाव : समीर पठाण नाशिकच्या द्राक्षशेतीने…

42 minutes ago

यंदा मुबलक बियाणे, पेरणीची नको घाई !

कृषी विभागाचे शेतकरी वर्गाला आवाहन नाशिक ः प्रतिनिधी शेतकर्‍यांनी पेरणी व लागवडीची घाई करू नये,…

50 minutes ago

रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये मोठी कपात

गृह, वाहन कर्जाचा हप्ता कमी होणार नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी (दि.6) रेपो…

1 hour ago

जगातील सर्वांत उंच चिनाब पुलावर फडकला तिरंगा

मोदींच्या हस्ते लोकार्पण श्रीनगर : काश्मीरला देशाच्या इतर भागाशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्स्प्रेस काल…

1 hour ago

‘लाडकी बहीण’साठी ‘सामाजिक न्याय’ला फटका

410 कोटींचा निधी वळवला; वादाची ठिणगी पडणार? मुंबई : लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची पुरती दमछाक…

1 hour ago

महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार,

मनोमिलनावर उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य मुंबई : महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, आता…

1 hour ago