समृद्धी महामार्गावर खासगी बस पेटली; २५ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर खासगी बस पेटली; २५ जणांचा मृत्यू

औरंगाबाद –
समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातांची मालिका सुरूच आहे. सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजता टायर फुटल्याने खासगी बस उलटली व पेट घेतला. यात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौकात गतवर्षी अशाच अपघातात १४ जणांना प्राण गमवावे लागले होते.
नागपूरवरून खासगी प्रवासी बस ही समृद्धी महामार्ग मार्गे पुण्याला जात होती. दरम्यान सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. या दरम्यान सिमेंट रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला आणि बघता बघता आगीने रौद्ररुप घेतले. परंतू अर्धवट झापेत असलेल्या प्रवाश्यांना बसमधून बाहेर पडता न आल्याने यात ही मोठी झाली, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

18 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

19 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

19 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

19 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

19 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

20 hours ago