समृद्धी महामार्गावर खासगी बस पेटली; २५ जणांचा मृत्यू
औरंगाबाद –
समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातांची मालिका सुरूच आहे. सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजता टायर फुटल्याने खासगी बस उलटली व पेट घेतला. यात २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. नाशिकमधील औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौकात गतवर्षी अशाच अपघातात १४ जणांना प्राण गमवावे लागले होते.
नागपूरवरून खासगी प्रवासी बस ही समृद्धी महामार्ग मार्गे पुण्याला जात होती. दरम्यान सिंदखेड राजा नजीक बसचे टायर फुटल्याने ही बस रस्त्यावर उलटली. या दरम्यान सिमेंट रस्त्यावर घर्षण होऊन बसने पेट घेतला आणि बघता बघता आगीने रौद्ररुप घेतले. परंतू अर्धवट झापेत असलेल्या प्रवाश्यांना बसमधून बाहेर पडता न आल्याने यात ही मोठी झाली, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नाशिक: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तिकीट न दिल्यामुळे नाराज झालेल्या कॉंग्रेस प्रदेश प्रवक्त्या हेमलता पाटील…
मनमाडला रेल्वे कर्मचाऱ्याचा कांदे भरत असतांना शॉक लागून मृत्यू मनमाड : प्रतिनिधी मनमाडनजीक असलेल्या नागापूर…
8 लाख 75 हजार 912 शेतकर्यांची फार्मर आयडीकडे पाठ सिन्नर : भरत घोटेकर कृषी विभागाच्या…
दोन लाखांचे नुकसान; ऐन उन्हाळ्यात जनावरांच्या तोंडचा घास हिरावला सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील घोटेवाडी येथील…
नाशिक : प्रतिनिधी भारतीय वंशाच्या अमेरिकेत वास्तव्य असलेल्या दातृत्वाने नर्गिंस दत्त विद्यालयातील 20 मुलींना नवीन…
उपनगर वार्ताहर: उपनगर-गांधीनगर संयुक्त जयंती समितीतर्फे यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आगळ्यावेगळ्या प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी…