नाशिक

१ डिसेंबर पासून विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई

 

नाशिक : वार्ताहर

येत्या १ डिसेंबर पासून विना हेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुचाकीवरील अपघखत रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी हेल्मेट वापरा संदर्भाचे नागरिकांना आव्हान केले आहे.
शहरामध्ये हेल्मेट न वापरल्यामुळे रस्त्यावरील अपघातामध्ये ८३ मोटार सायकल स्वारांचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे. त्याच प्रमाणे गंभीर अपघातामध्ये २६१ दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झालेले आहेत. बरेच दुचाकीस्वाराचे अपघात रस्त्यावर पडून डोक्याला मार लागल्यामुळे होतात. रस्त्यावर डोके आपटून मृत्यू होण्याचे प्रमाणे अधिक आहे. दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे मोटार वाहन अधिनियम नुसार बंधनकारक आहे. हेल्मेट न वापरता दुचाकी वाहन चालविल्यास पाचशे- दंडाची तरतूद आहे. हेल्मेट वापरणे हे वैयक्तिक सुरक्षिततेच्या दृष्टीने तितकेच महत्वाचे आहे. हेल्मेट वापरल्यामुळे दुर्दैवाने अपघात झालाच तर डोक्याला व चेह-याला गंभीर इजा होत नाही. तसेच जीवीत हानी देखील होत नाही .
नाशिक शहरामध्ये प्रायोगिक तत्वावर पोलीसांनी राष्ट्रीय महामार्ग ३ गस्त वाढविल्याणे प्राणांतिक अपघातांमध्ये ब-यापैकी घट झाल्याचे दिसून आले आहे. वाढविलेल्या गस्तीमुळे काही वाहन चालकांचा जीव वाचलेला आहे. यापूर्वी देखील हेल्मेट वापराबद्दल पोलीस आयुक्तालयामध्ये वेळोवेळी मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. व त्या त्या वेळी अपघाताच्या संख्येमध्ये, प्राणांतिक अपघातामध्ये व गंभीर दुखापतीमध्ये घट झाल्याचे आढळून आलेले आहे.

शहरातील नागरिक कायदा व सुव्यवस्थेचे स्वंयस्फूर्तीने पालन करतात त्यामुळे सुजान नागरिकांना सक्ती करण्याची आवश्यकता पडत नाही. दुचाकीस्वारांचे होणारे अपघात व त्यामध्ये होणारी प्राणहानी, गंभीर दुखापत व त्यामुळे येणारे अपंगत्व या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणा-यांविरुध्द पोलीसांना नाईलाजास्तव कडक कारवाई करावी लागते. यामुळे पोलिस आयुक्तांनी नाशिककरांना दुचाकी वापरतांना हेल्मेट चा वापर करण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे.

नाशिक शहरातील सर्व दुचाकीस्वारांना त्यांनी योग्य प्रतीचे हेल्मेट वापरून आपले दुचाकी वाहन चालवावे व वाहतूक नियमांचे पालन करावे .
०१ डिसेंबर 22 पासून नियमभंग करणा-या विरुध्द मोटार वाहन कायदा अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात येईल.
जयंत नाईकनवरे ,पोलिस आयुक्त

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

18 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

18 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

18 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

18 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

18 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

18 hours ago