ऐलतीर-पैलतीर

नदीच्या ऐलतीरावरून पैलतीरावर जर जायचं असेल तर आपल्याला तिचं ते भलंमोठं पात्र तर पार करावंच लागतं. त्याशिवाय आपल्याला पैलतीर गाठता येत नाही. अशात मग काही संकटेही येतात. कधी प्रवाहाचा वेग वाढून अडथळा येतो तर कधी प्रवाहासोबत येणारे त्रासदायक जीव त्रास देतात. कधी कचरा आला तर तो बाजूला सारावा लागतो. अन् मग पुढं जावं लागतं तो पैलतीर गाठायला.
अगदी तसंच काहीसं आपल्या आयुष्याचंही असतं ना!. आयुष्याचा ऐलतीर हा सुंदर अशा त्या बालपणीच्या कोवळ्या लुसलुशीत दाट हिरवळीने आच्छादलेला असतो. अगदी सुखद असाच तर पैलतीर म्हणजे उतारवय, वृद्धत्व आणि या दोन्ही तीरांच्या मधली जागा म्हणजे जीवनाच्या नदीचे तारुण्याचे विस्तीर्ण असे पात्र, जबाबदारी पेलण्याचा हा काळ असतो आणि त्या जबाबदार्‍या पेलताना आणि स्वतःला सिद्ध करताना त्या पैलतीरी जाण्याच्या काळात मात्र कैक अडथळेही पार करावे लागतात. कधीकधी सुखाच्या लहरीसोबत दुःखाच्या लहरीही येतात आणि त्यात मध्येच त्यांच्या प्रवाहाचाही वेग कधी तरी अचानक वाढतो. आणि त्याही मग सहन करून हातपाय मारून पुढं चालावं लागतं अन् तारुण्याचं ते पात्र शिताफीने पार करावं लागतं. ऐलतीरावरून तारुण्याच्या पात्रात स्वप्नं उराशी बाळगून उतरताना तर खूप छान वाटतं खरं पण जेव्हा कर्तव्य, जबाबदारी, स्वप्नपूर्ती यांच्या खाली आपण दबून जातो तेव्हा मात्र वाटतं की, खरंच तो ऐलतीर किती छान होता ना!
अन् मग पैलतीरावर गेलं तरी ऐलतीरी आपसूक वळून वळून पाहिलं जातं आणि मन मात्र सतत ऐलतीरीच त्या बालपणात मुक्तपणे रेंगाळत असतं. कारण पैलतीराच्या पुढली काही कल्पनाच आपण करू शकत नाही. त्यामुळे तेव्हा ऐलतीर आठवून रमल्याशिवाय पर्याय आपल्याला नसतो. खरं तर जिथून खर्‍या अर्थाने आपलं आयुष्य सुरू होतं आणि घडत असतं तो काळ खूप महत्त्वाचा असतो आणि मग बरेचदा तसंच काहीसं बालपणासारखं अल्लड वागलंही जातं. म्हणतात ना, वृद्धत्व म्हणजे दुसरं बालपणच अगदी तसंच काहीसं. आपल्याला कितीही वाटलं की, ऐलतीरीच थांबावं तरी ते नाही शक्य होत ना! कारण तसा निसर्ग नियमच आहे. आयुष्यात बालपणाच्या ऐलतीरावरून तारुण्याच्या पात्रात आणि मग उतारवयाचा तो पैलतीर तर आपल्याला गाठावाच लागतो. अन् मग शेवटी ऐलतीराच्या त्या प्रेमळ, आल्हाद आणि तनमनाला असीम असा गारवा देणार्‍या त्या सुखद अशा आठवणींच्या सिंचनाने तो पैलतीरही मग हिरवळ करण्याचा नक्कीच प्रयत्न होतो…
-वंदना गांगुर्डे

Bhagwat Udavant

Recent Posts

गवंडगाव येथे आज चैत्र पाौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन

गवंडगाव येथे चैत्र पाौर्णिमा यात्रोत्सवाचे आयोजन भाविकांनी यात्रात्सोवास येण्याचे  मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वडनेरे यांचे…

4 hours ago

सातपूर हादरलं; अज्ञात हल्लेखोरांकडून तरुणाचा खून

सातपूर हादरलं; अज्ञात हल्लेखोरांकडून तरुणाचा खून   संशयित आरोपी फरार, पथकाकडून शोध   सातपूर: प्रतिनिधी…

5 hours ago

नाशिकरोड ‘एमपीए’च्या पदाधिकार्‍यांची निवड

नाशिकरोड : वार्ताहर युरेथ्रल स्ट्रिक्चर अत्याधुनिक पद्धतीने शस्रक्रिया कक्षींन आता सुरळीत करता येते. वारंवार यूरेथ्रा…

1 day ago

भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी महावीर जयंती साजरी

नाशिकरोड : वार्ताहर जैन धर्माचे 24 वे तीर्थंकार भगवान महावीर यांचा 2624 जन्मकल्याणक म्हणजे जन्मदिन…

1 day ago

नैसर्गिक साधनांचा वापर करत विद्यार्थ्यांनी बनवली 140 घरटी

चिमण्यांसाठी केली दाणापाण्याची सोय, शहा येथील भैरवनाथ विद्यालयाचा पर्यावरणस्नेही उपक्रम सन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील शहा…

1 day ago

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले?

पोलीस ठाण्यातच  दोन पोलीस एकमेकांना भिडले नेमके काय कारण घडले? सिडको :  विशेष प्रतिनिधी सरकार…

1 day ago